प्रेम विवाह केलेल्या विवाहितेने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नवी मुंबईतील बेलापूर येथे घडली. याप्रकरणी पीडित विवाहितेचा पती, सासू, सासरे यांच्याविरोधात छळवणूक आणि आत्महत्येस कारण म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हरी वाढवे हे आपल्या कुटुंबासह बेलापूर येथील पंचशील नगर येथे राहतात. त्यांनी गावाकडील कपील राऊत याला आसरा देत नौकरीस लाऊन दिले. दरम्यान त्याचे घरी येणे जाणे वाढले आणि त्यात हरी यांची मुलगी अंजली आणि कपील यांची मैत्री आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. याची माहिती मिळताच कुठलीही आडकाठी न घेता दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने ३ जून २०२२ मध्ये साखरपुडा आणि ५ जूनला लग्न लाऊन दिले. मुलगी सुखात राहावी म्हणून कपिल याच्या वडिलांनी मागणी केल्याप्रमाणे ५ लाख रुपये लग्नासाठी दिले.

Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
Sharad pawar on Udyanraje bhosale lok sabha election
“राजेंबद्दल आम्ही प्रजा…”, उदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांची प्रतिक्रिया, भाजपाला टोला
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”

हेही वाचा – नवी मुंबई महापालिकेकडून शून्य कचरा उपक्रम मोहीम, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सातत्य निर्माण करणार

लग्न बौद्ध विहार भीमनगर कळमनुरी जिल्हा हिंगोली या मूळ गावी पार पडले. त्यातही अचानक केलेली ५० हजार रुपयांची मागणीही उसनवारी करून पूर्ण करण्यात आली. मात्र, लग्न झाल्यावर २० दिवसांनी मुलगी माहेरी आल्यावर सासरचे चांगले नसून पूर्ण पैसे दिले नाही म्हणून टोमणे मारतात ही तक्रार आली. कालांतराने हा त्रास वाढला. सासर माहेरजवळ असल्याने अंजलीचे माहेरी येणे जाणे होत होते, त्यामुळेही घरात वाद होत होते. दरम्यान हळू हळू ठीक होईल म्हणून समजूत काढली जात होती. मात्र, डिसेंबरमध्ये अंजली माहेरी आली ती कायमचीच. तिच्याकडील दागिने काढून घेत हाकलून दिल्याची माहितीही अंजली हिने दिली. तेव्हापासून ती माहेरीच राहत होती.

हेही वाचा – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘सुकन्या समृध्दी योजना’ गुरुवारी दि ९ व १० फेब्रूवारी दोन दिवस मोहीम राबविण्यात येणार

३० जानेवारीला नेहमीचे काम संपवून हरी हे घरी आले त्यावेळी घराला आतून कडी होती, मात्र अनेकदा हाक मारून दार न उघडल्याने त्यांनी शेजाऱ्याकडून हातोडी घेत दरवाजा तोडला व आत प्रवेश केला असता अंजलीने फाशी घेत आत्महत्या केल्याचे दृश्य दिसले. तिला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याबाबत ५ जून २०२२ ते १ डिसेंबर २०२२ दरम्यान हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने मुलीचा जाच करून शिवीगाळ करीत शारीरिक मानसिक त्रास दिल्याने मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार केली आहे. एनआरआय पोलीस ठाण्यात पती कपील राऊत सासू सिंधुताई आणि सासरा प्रल्हाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.