राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पुढच्या एका वर्षासाठी मोफत रेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारने ३० डिसेंबर रोजी एक परिपत्रक काढले आहे.त्यामुळे राज्यातील लाभार्थी कुटुंबांना या पुढील एक वर्ष मोफत धान्य मिळणार असून नवी मुंबई शहरात ४८ हजार कुटुंबे याचा लाभ घेतील.

हेही वाचा- नवी मुंबईत ड्रग्ज, गांजा पार्टी; १६ नायझेरियन अटक

pimpri police commissioner office marathi news, pimpri police commissioner office latest news in marathi
पिंपरी : अखेर पाच वर्षांनी पोलीस आयुक्तालयाला मिळाली हक्काची जागा, ‘या’ ठिकाणी होणार आयुक्तालय
treatment in private hospitals
गरीब रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात उपचार मिळणार, राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष कार्यान्वित
In the name of share trading two highly educated people were cheated of two and a half crores
पनवेल: शेअर ट्रेडींगच्या नावाखाली दोन उच्चशिक्षितांना सव्वा दोन कोटींचा गंडा
live webcast of voting process at more than 46000 polling stations in maharashtra
राज्यातील ४६ हजारपेक्षा जास्त मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग

राष्ट्रीय अन्न सुरक्षा २०१३ या कायद्यांतर्गत नागरिकांना ३ रुपये किलोने तांदूळ तर २ रुपये किलोने गहू दिले जातात. ही योजना डिसेंबर २०२२ पर्यंत होती. मात्र केंद्र सरकारने ३१डिसेंबर २०२२ रोजी संपणाऱ्या राष्ट्रीय अन्न सुरक्षांतर्गत मोफत रेशनच्या योजनेला आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पुढील डिसेंबर २०२३पर्यंत ही मोफत अन्नधान्याची योजना सुरू राहणार आहे . यासाठी लाभार्थ्यांना एक रुपयाही द्यावा लागणार नाही.

हेही वाचा- नवी मुंबई: दुकानधारकांचे बस्तान आता फुटपाथवर, पादचाऱ्यांना नाहक त्रास; सामासिक जागा वापरावरील कारवाई मंदावली

केंद्र सरकार या योजनेवर वर्षाला सुमारे २ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. या योजनेची अंमलबजावणी व्हावी म्हणून राज्यातील सर्व कक्ष अधिकारी,शिधावाटप नियंत्रक,यांना राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाकडून ३०, डिसेंबर रोजी एक पत्रक जारी केले असून या योजनेविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील लाभार्थी कुटुंबांना या पुढील एक वर्ष मोफत धान्य मिळणार असून नवी मुंबई शहरात ४८ हजार कुटुंबे याचा लाभ घेतील.