बुधवारी उरण पनवेल मार्गावर झालेल्या अपघातात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दोन वेगवेळ्या अपघाताला कंटेनर वाहने जबाबदार आहेत. आशा प्रकारच्या कंटेनरच्या धडकेत या वर्षात मागील ९ महिन्यात २५ जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे या यमदूत रुपी कंटेनरना आणखी किती बळी हवेत असा सवाल येथील वाहन चालक व जनतेकडून केला जात आहे. कारण यातील बहुतांशी अपघात हे रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या बेकायदा कंटेनर वाहनांमुळे झाले आहेत. किंवा भरधाव कंटेनर वाहनाने धडक दिल्याने झाली आहेत.

हेही वाचा- नागरिकांच्या सतर्कतेमुळे भामट्याला अटक; जेष्ठ नागरिकाची ५० हजार रुपयांची सोनसाखळी सापडली

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

जेएनपीटी बंदरातील मालाची ने आण करणारी दहा हजारांहून अधिक कंटेनर वाहने दररोज उरण मधील दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरून ये जा करीत आहेत. या कंटेनर वाहनांच्या बेदरकारीमुळे ३३ वर्षात शेकडो दुचाकीस्वाराना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सुरुवातीला अरुंद व खड्डेमय रस्त्यामुळे तर सध्या रस्ता रुंदीकरणा नंतर जेएनपीटी बंदर ते नवी मुंबई व पळस्पे या दोन्ही मार्गावर बेकायदा उभी करण्यात आलेल्या कंटेनर वाहनांचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

हेही वाचा- लवकरच नवी मुंबईकरांना मिळणार डबल डेकरची सफर ! एनएमटीच्या ताफ्यात १० विद्युत डबल डेकर बस दाखल

जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या जेएनपीटी ते किल्ला (नवी मुंबई) व जेएनपीटी ते पळस्पे या दोन्ही राष्ट्रीय मार्गावर उरण सामाजिक संस्थेने केलेल्या आंदोलनामुळे प्रवासी वाहतूक व गावांना जोडणाऱ्या सेवा(सर्व्हिस) मार्गाची उरणारणी करण्यात आली आहे.मात्र ही सेवा मार्गच कंटेनर वाहनामुळे वाहनतळ झाली आहेत. त्यामुळे प्रवासी व दुचाकी वाहने मुख्य मार्गाचा वापर करीत आहेत. याचा फटका या वाहनांना बसून अपघातात वाढ झाली आहे.

हेही वाचा- उरणचे प्रवेशद्वार असलेला चारफाटा पुन्हा अंधारात; नागरिकांची गैरसोय

बुधवारी उरण पनवेल मधील जासई गावाजवळ झालेल्या अपघातात अवघ्या २० वर्षाच्या तरुणांचा तर गव्हाण फाटा येथील मार्गावर एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कंटनेर रुपी यमदूताना आणखी किती बळी हवेत असा प्रश्न केला जात आहे.