गणेश चतुर्थी ते अनंतचतुर्थी च्या कालावधीत उरण शहरातील विसर्जन करतांना निर्माल्य तलावात न टाकता ते निर्माल्य कलशात गोळा करून जमा झालेल्या एकूण दिड टन निर्माल्यातून शहरातील नागरिकांसाठी नगरपरिषदेने बायोगॅस व खताची निर्मिती केली आहे.

हेही वाचा >>>चौदा गावांच्या समावेशाने नवी मुंबईकर नाराज

Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण
way of dharavi redevelopment is cleared railway land finally transferred to DRP
धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, रेल्वेची २५.५७ एकर जमीन अखेर ‘डीआरपी’कडे हस्तांतरित
houses in Worli BDD
वरळी बीडीडीतील अंदाजे ५५० घरांचा ताबा वर्षाखेरीस, ३३ पैकी १२ इमारतींची कामे सुरु
Complaint to the Election Commission against Mahavitaran under jurisdiction of Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांच्या अखत्यारीत येणाऱ्या महावितरणविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, जाणून घ्या कारण…

उरण नगरपरिषदे ने गणेशोत्सवात विसर्जनावेळी नागरिकांनी आणलेले निर्माल्य तलावात न टाकता निर्माल्य कलशात गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. यावेळी उरण नगरपरिषदेने विमला तलाव आणि भवरा तलाव येथील जमा झालेल्या निर्माल्या पासून बायोगॅस व खत निर्मिती केली आहे .

हेही वाचा >>> नवी मुंबईच्या विकास आराखड्यावर तुरळक हरकती

जल ,नैसर्गिक व मानवनिर्मित पाण्याचे स्त्रोताचे संवर्धन व संरक्षण व्हावे ,तलावातील पाण्याचे प्रदूषण होवू नये हा उद्देश ठेउनच निर्माल्य तलावात न टाकता ते स्वतंत्र व्यवस्था केलेल्या ठिकाणी टाकण्याचे आवाहन नगरपरिषदे कडून करण्यात आले होते. जेणे करून जमा केलेल्या निर्माल्याचे वर्गीकरण करून त्यातील ओल्या निर्माल्यापासून बायोगॅस व खत निर्मिती केली केली असल्याची माहिती उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली आहे. या कामात नगरपरिषदेचे कर्मचारी व लोकप्रतिनिधी व उरणच्या नागरिकांनी मदत केली.