उरण : रानसई धरणाची निर्मिती होऊन ६० ते ६५ वर्षे झाली असून त्यानंतर लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणातही प्रचंड वाढ झाल्याने त्या पटीने पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र ५० वर्षांपूर्वीचाच पाणीसाठी आजही कायम आहे. धरण गाळाने भरल्याने उलट त्यात मोठी घट झाली आहे. असे असताना पाणीसाठा वाढीसाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या उरणकरांची व उद्योगांची तहान भागविण्यासाठी ४ हजार दशलक्ष लिटर पाणी कमी पडत आहे. रानसई धरणात पुरवठा करता येईल असा सात हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. सध्या पावसाने दडी मारल्याने धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे उरणकरांच्या वाढीव पाण्याची तरतूद न केल्यास भविष्यात उरणकरांना कायमस्वरूपी पाणी कपातीची टांगती तलवार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uran residents needs 4000 million liters of water per year zws
First published on: 29-06-2022 at 20:54 IST