शासन दरबारी विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी, सरकारचे लक्ष वेधण्याकरिता माथाडी कामगार संघटनेने एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपामध्ये माथाडी कामगारांसह बाजार समितीतील व्यापारी, तसेच इतर बाजार घटक सहभागी होणार आहेत. पाचही बाजार समिती बंद आहेत. भाजीपाला बाजारात मंगळवारी भाजीपाल्याच्या ५०० ते ६०० गाड्या आवक होऊनही भाज्यांच्या दरात २० ते ३० टक्के वाढ झालेली आहे. भेंडी, गवार, हिरवी मिरची, वाटाणा, वांगी, फ्लॉवर या भाज्यांना अधिक मागणी असल्याने दरात वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१ फेब्रुवारीला बाजार समिती १०० टक्के बंद असल्याने मंगळवारी एपीएमसी बाजारात भाजीपाल्याच्या ५००-६०० गाड्या दाखल झाल्या आहेत. बाजारात जादा आवक होऊनही १ दिवस मार्केट बंद असल्याने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. विशेषतः हॉटेल व्यवयसायिकांकडून अधिक मागणी होती, त्यामुळे भेंडी, गवार, हिरवी मिरची, वाटाणा, वांगी, फ्लावर या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. मंगळवारी बाजारात भेंडी ११४४ क्विंटल , फ्लॉवर ३२८९, गवार १९२ क्विंटल, टोमॅटो १४८१ क्विंटल, हिरवा वाटाणा ३३५० क्विंटल, हिरवी मिरची ३४०८ क्विंटल आणि वांगी २८३ क्विंटल आवक झाली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetables rate increase as the market closed due to strike in navi mumbai ssb
First published on: 31-01-2023 at 17:31 IST