वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारात समितीत नोव्हेंबर पासून द्राक्षच्या हंगामाला सुरुवात होते. परंतु पाऊस लांबल्याने त्याचा फटका द्राक्षांच्या बागांना बसला असून यंदा उशिराने द्राक्षांचा हंगाम सुरू होणार आहे. एपीएमसी बाजारात दोन दिवसापासून द्राक्षांची तुरळक आवक सुरू झाली असून आंबट द्राक्ष बाजारात दाखल होत आहेत . त्यामुळे बाजारात व्यापारी सह ग्राहक गोड द्राक्षांच्या प्रतीक्षेत आहेत. हेही वाचा- नवी मुंबई: आरक्षित भूखंडांची सिडकोकडून विक्री ; सिडकोला भूखंड विक्रीतून १३०० कोटी रुपयांची कमाई नोव्हेंबर महिन्यात द्राक्षची आवक सुरू होते. तसेच जानेवारीमध्ये द्राक्षांचे प्रमाण अधिक वाढते. साधारण १५ नोव्हेंबर नंतर द्राक्षची अधिक आवक सुरू होत असून १५ एप्रिल पर्यत हंगाम सुरू असतो. मात्र, अद्याप बाजारात केवळ १ ते २ छोट्या गाड्या दाखल होत आहेत. तसेच बाजारात दाखल होणारे द्राक्ष चवीला आंबट येत असून ग्राहकांकडून याला ना लपसंती दर्शविण्यात येत आहे . तसेच येणारी द्राक्ष काही वेळाने सडत असल्याने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. ५ डिसेंबर नंतर आवक वाढेल असे मत व्यापारी संजय पिंपळे यांनी व्यक्त केले आहे.