मका पीक आपल्याकडे मोठय़ा प्रमाणावर चारापीक म्हणून घेतले जाते. वर्षभर चांगले आणि उंच वाढणाऱ्या या पिकापासून जास्तीतजास्त हिरवा चारा मिळतो. मका पिकामध्येही नऊ ते ११ प्रथिने असतात आणि या प्रथिनांची पचनीयता सर्वात जास्त म्हणजे ६५ ते ६८ टक्के असते. त्यामुळे जनावरांच्या आहारात मक्याच्या हिरव्या चाऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पारंपरिक एकदल पिकाबरोबरच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ओट या पिकाची लागवड करतात. या पिकाची वाढ झपाटय़ाने होत असल्यामुळे ५० ते ५५ दिवसांत पहिली कापणी तर ३५ ते ४० दिवसांनी दुसरी कापणी करता येते. चाऱ्याचे उत्पादनही भरपूर मिळते आणि प्रथिनेही आठ-नऊ टक्क्यांपर्यंत मिळतात.
एकदल हंगामी पिकाबरोबरच द्विदल पिकांचीही लागवड करणे गरजेचे आहे. द्विदल पिकामध्ये सर्वात लोकप्रिय चारा पीक म्हणजे लसूणघास. सर्वात जास्त म्हणजे १९-२२ प्रथिने असलेला तसेच इतरही अनेक अन्नघटकांचे भांडार असलेला जनावरांच्या आवडीचा लसूणघास. लागवड केल्यानंतर दोनतीन वष्रे टिकणारा, प्रत्येक महिन्याला कापणीसाठी तयार होणाऱ्या या चाऱ्याला दुग्धव्यवसायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून एकूण चारापिकाखालील क्षेत्राच्या २५-३० टक्के क्षेत्र या पिकाखाली ठेवावे. चवळी या द्विदल वर्गातील पिकाचाही चारा म्हणून उपयोग होतो. विशेषत: खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये चवळीचे पीक चारा म्हणून घेता येते. यामध्येही १३ ते १५ टक्के प्रथिने आहेत. चवळीचीही लागवड केल्यानंतर ६० ते ६५ दिवसांनी कापणी करता येते. संकरित नेपियर ज्याला गिन्नी गवतही म्हटले जाते, त्याच्या काही चांगल्या जाती आहेत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जयवंत नावाची जात विकसित केली असून त्यामुळे दोन-तीन वर्षे चांगला चारा वर्षभर उपलब्ध होतो. पालेदार, जास्त गोडवा असणाऱ्या या पिकाच्या वर्षांतून सात-आठ कापण्या करता येतात. या चाऱ्यामध्ये आठ-नऊ टक्के प्रथिने असतात. याबरोबरच मारवेल ज्याला कांडीगवत म्हणतात, याचाही वापर बहुवर्षीय चारा पीक म्हणून शेतकरी करतात.

जे देखे रवी..- पशुपक्ष्यांची ज्ञानेश्वरी  ९
मी कामशेतला एका अरण्यातल्या शाळेत एक वर्ष होतो. अख्ख्या शाळेत एकूण मुलेमुली सोळा सतरा. अभ्यास होता, नाही असे नाही, परंतु मुलामुलींची कमतरता, वृक्ष आणि पशुपक्षी आणि शेजारीच वहात असलेल्या इंद्रायणीने भरून काढली हे आता कळते. त्रेसष्ट वर्षांपूर्वी दुर्बिण घेऊन जीपवर आरूढ होऊन निसर्गाचे अवलोकन करण्याची प्रथा नसणार. इथे तर निसर्गाचे सर्वत्र आवरण होते. त्या काळात एकदा मी सापांमधला प्रणय पाहिला होता. ‘पण तो विसरा कारण पण तो अपशकून असतो’ असे गावकऱ्यांनी सांगितल्याचे आठवते. त्याच वर्षांत एक साप काहीतरी अति विचित्र वळवळ करत एकाच जागी वेटोळे करून होता असे एकदा दिसले तेव्हा आम्हा पोरापोरींना गपचीप तिथेच उभे करण्यात आले. मग एक आश्चर्य घडले आणि साप आळोखे-पिळोखे देत एकदम तरतरीत होऊन बाहेर पडला आणि उरली फक्त त्याची कात. ती तिथेच टाकून मग तो सळसळ करत गवतात घुसला आणि नाहीसा झाला. नेहमीच्या शिररस्त्याने त्या कातेला पहिल्यांदा हात लावणारा आमच्यातला प्राणी म्हणजे मी. ती कात मी एका पुस्तकात अनेक वर्षे  जपून ठेवली होती.
 गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या आठव्या आध्यायात मरणाची गोष्ट सांगण्यात आली आहे त्यात ‘सापाने कात टाकली। उकडल्यावर वस्त्रे काढली। तिथे कोठे झाली इजा। अवयवांना।।’ अशा अर्थाची ओवी ज्ञानेश्वर सांगतात.
 परंतु त्या ओवीत नेहमीप्रमाणे ग्यानबाची मेख (गाठ) आहेच आहे. अवयवांचा उल्लेख करण्यात आला आहे. कारण माणसांचे आपल्या अवयवांवर मोठे प्रेम असते. शीर सलामत तो पगडी पचास (मिल सकती है) त्यापैकीच हा दृष्टांत. पण ज्ञानेश्वर इथे ‘‘दूसरा’’ नावाचा हल्ली चेंडू टाकण्याचा प्रकार असतो त्याचा प्रयोग करत आहेत. जसे अवयव शाबूत राहिले तसेच आणि त्याच धर्तीवर शरीर पडले तरी ज्या चैतन्याच्या जोरावर शरीर आकार घेते ते चैतन्य काही मरत नाही असा गर्भितार्थ त्या ओवीत दडला तर आहेच पण लगेचच. त्यानंतरची ओवी म्हणते.. ‘शरीराचेही आहे हेच। गेले तरी उरते चैतन्य तसेच। हे म्हणणे घे कवेत। हाच तो ज्ञानाचा विकास।। ’अर्थात हे म्हणणे सोपे आणि वळणे अवघड, याचे कारण अवयवांची वळवळ.
 तरुणपणी तर असे काही सांगितले तर अवयवांची धडपड इतकी मगरमस्त असते की लोक मूर्खातच काढणार. आपण आकाराला चिकटलेले असतो. जडवादी (शरीर) आणि चैतन्यवादी (आत्मा) असे दोन प्रतिस्पर्धी संघ फार फार वर्षांपूर्वीपासून झगडत होते. मग वेदांत अवतरला आणि नंतर हल्ली आधुनिक पदार्थ विज्ञानाने प्रवेश केला आहे. त्याबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
wheat India wheat production estimated at 1120 lakh tonnes this year
यंदा गव्हाचे उच्चांकी उत्पादन? तापमान वाढीची झळ कमी; ११२० लाख टन उत्पादनाचा अंदाज

वॉर अँड पीस –  व्यसने कोणी करावी? कोणी करू नये!  – २
व्यसन सुटण्याकरिता उपाय – ज्यांना मनापासून दारू सोडायची इच्छा आहे त्यांनी जेव्हा दारू प्यावीशी वाटते त्या वेळी दोन-तीन कागदी लिंबाचा केवळ रस; साखर, पाणी किंवा मीठ न मिसळता प्यावा. मग खुशाल दारू प्यावयास घ्यावी. बहुधा दारू घशाखाली उतरत नाही. कारण दारू व आंबट लिंबू रस यांचा परस्परविरोध आहे. ज्यांना असे करावयाचे नाही त्यांच्या घरातील स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तींनी या दारुडय़ा माणसाच्या जेवणात कोशिंबीर, चटणी, रायते, भाज्यात सायट्रिक अ‍ॅसिड किंवा लिंबूक्षार नावाचे साखरेच्या कणासारखे केमिकल्स मिळतात, ते चारपाच कण टाकावेत. ते फार आंबट असतात. त्याची किंमत नाममात्र असते. कोणत्याही केमिस्टकडे किंवा आयुर्वेदीय औषधी उत्पादकांकडे मिळतात. माझ्याकडे मी विनामूल्य देतो. असो. बिडय़ा, सिगारेट, तंबाखू, गुटखा यांच्याकरिता बडीशेप, आवळा-सुपारी, धनेडाळ असे पर्याय वापरावेत. गुळवेलीच्या रसात खललेल्या, हिरडय़ाच्या चूर्णाच्या २०० मि. ग्रॅम वजनाच्या गोळ्या कराव्या. त्या चघळत राहिले तर या पदार्थाची सणक जाते असा अनुभव आहे. मशेरी लावल्याशिवाय ज्यांना चैन पडत नाही त्यांनी ‘स्वस्तिक दंतमंजन’ किंवा गेरूचे कोणतेही दंतमंजन वापरावे. ज्यांची शौचाची तक्रार आहे व त्याकरिता मशेरी लावावे लागते त्यांनी रात्री गंधर्वहरितकी चूर्ण, त्रिफळाचूर्ण अशा चूर्णाचा वापर करून पाहावा. भूक लागत नाही, पचनाची सबब सांगून जे मद्यपान करू इच्छितात त्यांनी कुमारीआसव, द्राक्षारिष्ट, पिप्पलादिकाढा, पंचकोलासव असे काढे वापरून पाहावे. फायदा निश्चित होतो.
एककाळ दारूची दुकाने गावाबाहेर असत. दारू पिणारा माणूस चुपचाप दारू पिऊन, मान खाली घालून अंधारात तोंड लपवत घरी येत असे. आता दारूला घरात प्रशस्ती प्राप्त झाली आहे. दारू पिणे हा प्रेस्टिजचा विषय झाला आहे. थोरामोठय़ांच्या बायकांना आपला नवरा फक्त उच्च दर्जाची फॉरेन लिकर पितो याचा अभिमान वाटतो. वा रे पत्नी – वा रे सखी-सचिव!
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – २ ऑगस्ट
१९१०> कवी पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म.  सावित्री, मातृका, अवलोकिता अशा कादंबऱ्या किंवा ‘रंगपांचालिक’ हे नाटकही पु.शिं.नी लिहिले होते, परंतु मराठी काव्याचे देहभान अधिक मुक्त,  अधिक निरामय करण्याचे कार्य त्यांच्या कवितेने केले आणि ‘कवी’ हीच त्यांची मुख्य ओळख राहिली. पुष्कळा, दोला, गंधरेखा, हे त्यांचे संग्रह यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. ‘अनीह’ या संग्रहाचे संपादन त्यांच्या मृत्यूनंतर झाले, त्यात आणीबाणीवरचीही (वीस आंधळे) एक कविता आहे! पण त्रिधा राधा, शहनाज्म, पुष्कळा या कवितांमधला देह-विदेही भावविचार (उदा. ‘क्षेत्र साळिचे राधा’) हे त्यांच्या कवितेचे वैशिष्टय़ ठरले होते.
१९३८ > राजकीय चर्चानाटय़ हा प्रकार मराठीत रुजवणारे गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांचा जन्म. उद्ध्वस्त धर्मशाळा, चाणक्य विष्णुगुप्त, अंधारयात्रा, रस्ते, एक वाजून गेला आहे, मामका पांडवाश्चैव ही त्यांची नाटके वा दीर्घाक राजकीय भूमिका आणि माणूसपण यांच्यातील ताणतणाव मांडणारे होते. ‘रहिमतपूरकरांची निबंधमाला’ (नाटकी निबंध व चर्चक निबंध) तसेच स्वतच्या नाटकांच्या प्रस्तावना यांतून त्यांची समीक्षकवृत्ती दिसून येते. चीन-अभ्यास शाखेचे विद्वान, अशी त्यांची ख्याती आहे.
– संजय वझरेकर