– डॉ. यश वेलणकर

‘डिप्रेशन’ हा आजार कोणत्याही जंतूमुळे होत नसला, तरी साथीच्या आजारासारखा वेगाने वाढतो आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनानुसार, जगात ३० कोटी लोकांना कोणत्या न् कोणत्या प्रकारचे ‘डिप्रेशन’ आहे. आत्महत्या आणि व्यसनाधीनता यांचे मुख्य कारण ‘डिप्रेशन’ हेच आहे. ‘डिप्रेशन’ का होते, याबद्दल संशोधन सुरू आहे. माणसाचा मेंदू बाह्य़ परिस्थिती आणि शरीरातील घडामोडी यांना जाणून दोन निकषांवर प्रतिक्रिया करीत असतो. एक निकष- हा अनुभव चांगला की वाईट, असा असतो. दुसरा निकष- ‘अराउज्ड’ म्हणजे उत्तेजित होऊन लगेच कृती आवश्यक की शांत राहणे योग्य, असा असतो. या दोन निकषांचा एकत्रित परिणाम म्हणून ‘सुखद शांत’, ‘सुखद सक्रिय’, ‘दु:खद शांत’ आणि ‘दु:खद सक्रिय’ अशा मनाच्या चार स्थिती निर्माण होतात.

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

माणूस निवांत, रिलॅक्स असतो, त्या वेळी ‘सुखद शांत’ स्थिती असते. ‘सुखद सक्रिय’ म्हणजे तो काही तरी करीत असतो आणि ती कृती आनंददायी असते. ‘दु:खद सक्रिय’ स्थिती त्रासदायक तणावाची आणि चिंतेची असते. ‘दु:खद शांत’ स्थिती औदासीन्याकडे झुकणारी असते. आपल्या रोजच्या आयुष्यात या चारही अवस्था कधी ना कधी येत असतात. निवांतपणा, उत्साह, काळजी आणि कंटाळा हे मूड्स म्हणजे चार नैसर्गिक भावना आहेत. आपला मनाचा लंबक या चार स्थितींच्या वर्तुळात फिरत असतो. मात्र तो ‘दु:खद सक्रिय’ आणि ‘दु:खद शांत’ या दिशांना अधिक दूरवर जाऊ लागला, की मानसिक अस्वस्थता वाढू लागते. हळूहळू याच दोन स्थिती अधिकाधिक वेळ राहू लागतात. सुखद स्थितीच्या अवस्थेत मन जातच नाही, गेले तरी फार काळ राहात नाही. मनात चिंता किंवा उदासी निर्माण करणारे विचार अधिकाधिक येऊ लागतात. या दोन्ही भावना आलटून पालटून जाणवू लागतात.

काही जणांत लंबक एकाच ठिकाणी अधिक राहू लागतो आणि केवळ चिंता किंवा फक्त औदासीन्यदेखील असू शकते. तीव्र दु:खद सक्रिय स्थितीमध्ये आत्महत्येचे प्रयत्न होतात. ते कमी करण्यासाठी वैद्यकीय मदत, औषधे, मानसोपचार आवश्यक आहेत. पण अशी स्थिती येऊ द्यायची नसेल, तर ‘मानसिक प्रथमोपचार’ ही संकल्पना समजून घेऊन रूढ करायला हवी.

yashwel@gmail.com