डॉ. श्रुती पानसे – contact@shrutipanse.com

काही घरांमध्ये एकमेकांवर भयंकर मोठमोठय़ानं आवाज चढवून बोलण्याची, साध्या साध्या गोष्टींत एकमेकांवर रागावून बोलण्याची सवय असते. अशा घराचं तापमान बरंच वाढलेलं असतं.

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?

इथं वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी. मुलांनी जर हे आक्रमक वागणं घरात नाही तर माध्यमांमध्ये पाहिलं असेल; तरी त्यांना असंच वाटतं, की हेच वागणं नैसर्गिक आहे, योग्य आहे. म्हणून मुलं पुन्हा पुन्हा तसंच वागतात. समजा मुलांची पालकांशी भेट होत नसेल किंवा भेटले तरी एकमेकांत संवाद होत नसेल, त्यामुळे मूल आणि पालक यांच्यात दरी असेल, अशा स्थितीतही हळूहळू मुलांची वृत्ती आधी हट्टी आणि त्यातून आक्रमक होत जाते. आक्रमकता ही केवळ शारीरिक नाही, तर शाब्दिकही असते. सुस्थिर कुटुंबातून आलेली मुलंदेखील आक्रमक असतात.

इथं मूल असं का करत आहे, याच्या मुळाशी जाण्याची गरज असते.

आक्रमकता ही सोडून देण्याची गोष्ट निश्चितच नाही. गांभीर्यानं घ्यायला हवं हे नक्की. आक्रमक मुलाच्या वागण्याची सारवासारव करून विषय बंद करायची गरज नसते. टीन एजमधलं मूल असेल तर शरीराच्या आत असलेल्या संप्रेरकांचा आणि मेंदूतल्या रसायनांचा वादळी परिणाम म्हणून मुलं आक्रमक होत असतात. त्यावेळी वादळाला तोंड देण्यापेक्षा, नंतर बोलण्याची आवश्यकता असते.

मतभेदांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. या गोष्टी सकारात्मक पद्धतीनं हाताळायला हव्यात. मुलांशी जाणीवपूर्वक बोलायला हवं. जर मुलांचं वर्तन आक्रमक असेल, तर काही नियम करावे लागतील. आक्रमकता वाढली तर टोकाचं असामाजिक वर्तनदेखील घडू शकतं. अशा आक्रमकतेशी सामना करावा लागला तर काय करायचं, हे आधीच आपसात ठरवून घ्यावं लागतं.

मुलांनी पालकांशी आक्रमक वागणं, एखाद्या प्रसंगी हिंसक वर्तन करणं या गोष्टी सध्या वाढत आहेत. हा काही संपूर्णपणे पालकांचा दोष नाही. वातावरणातल्या अन्य गोष्टींमुळेसुद्धा हे घडू शकतं. अशा समस्या भावनांच्या आहारी जाऊन नाही, तर शांतपणे आणि योग्य पद्धतीनंच सोडवाव्या लागतात. हे आक्रमक वर्तन घडण्यामागचं कारण प्रत्येक वेळी पालकांचं वागणं असं म्हणून त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नसतो.