ताश्कंद डिक्लरेशन’ ऊर्फ ‘ताश्कंद अ‍ॅग्रिमेंट’ हा शांतता करार भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे १० जानेवारी १९६६ रोजी केला गेला. सोव्हिएत युनियनचे प्रमुख अलेक्सी कोसिजीन यांच्या मध्यस्थीने झालेल्या करारावर भारत सरकारच्या वतीने पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी, तर पाकिस्तानच्या वतीने पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी सह्य़ा केल्या. १९४७ साली भारत- पाकिस्तान फाळणीनंतर या दोन देशांमध्ये चिघळलेल्या सीमावादाने १९६५ मध्ये परत एकदा डोके वर काढले. ऑगस्ट १९६५ मध्ये पाकिस्तानी लष्कराने ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ या नावाने मोहीम काढून जम्मू काश्मीरच्या भारतीय प्रदेशात सन्य घुसवले. प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारनेही पाकिस्तानी लष्करावर हल्ला चढवला. ऑगस्ट आणि सप्टेंबर १९६५ मध्ये सतरा दिवस चाललेले हे युद्ध संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, अमेरिका आणि रशिया यांच्या प्रयत्नांनी २२ सप्टेंबर १९६५ रोजी युद्धबंदी करार होऊन थंडावले. दोन्ही बाजूंचे हजारो सनिक या युद्धात मारले गेले आणि दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच इतक्या मोठय़ा संख्येने रणगाडे आणि इतर शस्त्रास्त्रांचा वापर झालेले हे युद्ध होते असे म्हटले जाते. सतरा दिवस चाललेले हे युद्ध अनिर्णीत अवस्थेतच थांबले. या युद्धानंतर भारत आणि सोव्हिएत युनियनचे राजनतिक संबंध अधिक जवळचे झाले, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान चीनमध्ये अधिक जवळीक झाली. ४ ते १० जानेवारी १९६६ मध्ये ताश्कंद येथे झालेली ही बठक संयुक्त राष्ट्रे, अमेरिकी सरकारचे प्रतिनिधी आणि सोव्हिएत रशियन सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी यांच्या देखरेखीखाली झाली. करारात ठरल्याप्रमाणे भारत आणि पाकिस्तानने या युद्धात परस्परांच्या घेतलेल्या प्रदेशांवरील हक्कसोडून १९४९ साली नक्की केलेल्या युद्धबंदी रेषेपर्यंत माघार घेतली. ताश्कंदच्या या शांतता कराराची औपचारिकता पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी, ११ जानेवारी १९६६ रोजी एक दु:खद घटना घडली. भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना हृदयविकाराचे दोन झटके येऊन त्यांचे अकस्मात निधन झाले.

सुनीत पोतनीस

Pakistani flight attendants
पाकिस्तानी एअर होस्टेस अचानक देश का सोडतायत? कॅनडामध्ये आश्रय घेण्याची कारणे काय?
First Secretary Anupama Singh
“जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात…”, भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल
Narendra Modi Sharad Pawar
“यूपीए सरकारचे कृषीमंत्री दिल्लीत पॅकेज घोषित करायचे, पण ते पैसे…”, पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल
Pakistani Singer Shazia Manzoor Slaps Co host on Live Show
पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ

sunitpotnis@rediffmail.com

 

झाडांच्या पेशीतील आनुवंशिक तत्त्व

मानवी पेशींतील आनुवंशिक तत्त्वात ४६ गुणसूत्रांच्या २३ जोडय़ा असतात, तर चिपांझीच्या पेशींतील आनुवंशिक तत्त्वात ४८ गुणसूत्रांच्या २४ जोडय़ा असतात. मांजर ३८ (१९ जोडय़ा), कुत्रे ७८ (३९ जोडय़ा), घोडे ६४ (३२ जोडय़ा) वगरे. पेशीतील आनुवंशिक तत्त्वातील गुणसूत्रांच्या जोडय़ा म्हणजेच एकूण गुणसूत्रांची संख्या सजीवाची प्रजाती निश्चित करते.तसेच वनस्पतीच्या पेशींतील गुणसूत्रांची संख्या वनस्पतीची प्रजाती निश्चित करते. काही वनस्पतींतील गुणसूत्रांची संख्या: काजू-४२, मका-२०, कापूस-५२, वाटाणा-१४, द्राक्षे-३८, पेरू-२२, आंबा-४०, कांदा-१६, बटाटा-४८, पपई-१४, अननस-५० वगरे. सजीवांच्या शरीरातील किंवा वनस्पतीच्या प्रत्येक पेशीत, केंद्रक म्हणजे न्यूक्लीअस हा घटक असतो. त्यात आनुवंशिक तत्त्व म्हणजे गुणसूत्रे, जनुके, डीएनए, आरएनए वगरे घटक असतात. सजीवांच्या प्रत्येक प्रजातीच्या पेशीतील आनुवंशिक तत्त्वातील गुणसूत्रांची संख्या ठरलेली असते.

सजीवांच्या शरीराची किंवा वनस्पतींची वाढ होते याचे कारण म्हणजे, त्यातील पेशींत आपल्यासारख्याच अनेक पेशी निर्माण करण्याची क्षमता असते. या नवीन पेशींसाठी लागणारे वस्तुद्रव्य, आहारातून आणि पोषणद्रव्यातूनच घेतले जाते. यासाठी, आनुवंशिक तत्त्वात जनुकीय आज्ञावल्या असतात. काही कारणांमुळे या वाढणाऱ्या पेशींसाठी योग्य असे वस्तुद्रव्य मिळाले नाही तर त्या पेशींच्या जडणघडणीत जनुकीय बदल होतात आणि निराळे वाण निर्माण होते, कारण या पेशीत आनुवंशिक गुणधर्म पुढच्या पिढीत संक्रमित करण्याची क्षमता असते. डार्वनिने, त्याच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार, पर्यावरणीय परिस्थितीशी अनुकूलन करण्यासाठी सजीवात अनुकूल असे बदल होतात हे सिद्ध केले. वास्तविक हे बदल आनुवंशिक तत्त्वाचे जनुकीय बदल होते आणि ते प्रजातींच्या उत्क्रांत गुणधर्माच्या स्वरूपात प्रकट झाले.

१८६६ साली, ऑस्ट्रेलियन धर्मगुरू ग्रेगॉर मेन्डेल यांनी वाटाण्यांवर पद्धतशीर प्रयोग करून वाटाण्याचे रंग, आकार, शेंगा वगरे गुणधर्म पुढच्या पिढीत संक्रमित होण्यासंबंधी आनुवंशिकतेचे नियम सिद्ध केले. म्हणूनच मेन्डेल यांना अनुवंशशास्त्राचे जनक असे म्हणतात. त्याकाळी गुणसूत्रे, जनुके वगरे आनुवंशिक तत्त्वाचे घटक आणि जनुकीय आज्ञावल्या यांचा शोध लागला नव्हता. नवीन वाणे निर्माण होण्यासाठी आनुवंशिक तत्त्वात संकर होतो. हे आता आपल्याला माहीत झाले आहे.

डॉ. गजानन वामनाचार्य

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org