ऑक्टोबरच्या पहिल्या सोमवारी ‘जागतिक अधिवास दिन’ साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने १९८५ साली ठरवले. त्यानंतर दरवर्षी हा दिवस काही देश साजरा करतातही! त्याप्रमाणे २०२२ मध्ये ३ ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा करण्यात येईल. दरवर्षी एका ठरावीक मसुद्याचा विचार करून या दिनाचे आयोजन केले जाते. सर्वाना शाश्वत स्वरूपात निवारा मिळावा, पुरेशा सोयी-सुविधांनी युक्त घर असावे आणि विशेषत: बालके, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग अशा घटकांचा खासकरून विचार व्हावा. सर्वासाठी सुरक्षित व आरोग्यपूर्ण परिसर असावा. वाहतूक आणि ऊर्जास्रोत सहज उपलब्ध असावेत. मोकळय़ा व हिरव्या मैदानांची सुविधा असावी. अन्न व पाणी उत्तम दर्जाचे असावे. सांडपाणी निस्सारणाची योग्य व्यवस्था असावी. प्रत्येकाच्या परिसरात हवेचा दर्जा चांगला असावा. या ठिकाणच्या लोकांना रोजगाराची योग्य संधी असावी आणि हे सारे स्वप्नवत वाटणारे निकष पूर्ण करण्यासाठी शासनाने व इतर सामाजिक संस्थांनी कटिबद्ध व्हावे असे संयुक्त राष्ट्र संघटना म्हणते. त्यामुळेच यंदाचा मसुदा ‘तफावतींचे भान राखा’ (माइन्ड द गॅप) असा आहे. 

जागतिक अधिवास दिनाच्या निमित्ताने मनाला जे जाणवते ते असे की आपल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, जैव-भौतिक अशा  निरनिराळय़ा पातळय़ांवरदेखील आपल्याला जगण्याचा समतोल राखता आला पाहिजे. निसर्गाचे भान राखले पाहिजे. पण आत्ताच्या बदलत्या आणि असुरक्षित अशा हवामानातील स्थित्यंतराच्या काळात समग्र मानव जातीचे अस्तित्वच धोक्यात आलेले आहे. ढगफुटी, पूरपरिस्थिती, गारपीट, वणवे, कोठे कोरडे गेलेले कालखंड आणि पिके तयार असताना नको असलेला, कोसळणारा पाऊस या साऱ्यामुळे नैसर्गिक परिसंस्था धोक्यात आल्या आहेत. निसर्गाला ओरबाडताना, निसर्गानेच आपल्याला उत्तर म्हणून अनेक आपत्ती निर्माण केल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे निवारे उद्ध्वस्त होत आहेत.

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी
avimukteshwaranand saraswati
VIDEO : “गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देऊ”, नववर्षानिमित्त शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी व्यक्त केला संकल्प!
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन

मानवाच्या अधिवासांची जपणूक करताना विविध ठिकाणच्या प्रजाती, जैवविविधता यांचे अधिवासदेखील टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर येते. जर आपल्याला आपले अस्तित्व टिकवायचे असेल आणि आपल्या पृथ्वीचे भले करायचे असेल तर आपल्याला आपल्या सभोवताली असणाऱ्या सर्वच नैसर्गिक परिसंस्थांची व तिथल्या अधिवासांची जपणूक करणे अतिशय समर्पक आहे, आपले अधिवास निर्माण करताना आपण खूप साऱ्या पशुपक्ष्यांच्या, वनस्पतींच्या जगण्याचा अधिकारच काढून घेतो आणि पुढे जाऊन त्यांच्या निवाऱ्याचा विचार करणे तर सोडाच, परंतु ते नष्ट करून टाकतो. जागतिक अधिवास दिनाच्या निमित्ताने आपण त्यांना समान जगण्याचा हक्क देणे एवढे तरी केले पाहिजे.

डॉ. नंदिनी विनय देशमुख

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org