सुरेश ना. पाटणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शैवाल आणि पाणी हे परस्परपूरक असून जिथे जिथे पाणी असेल किंवा ओलसरपणा असेल तिथे शैवाल निर्माण होते. पिण्याचे पाणी साठवल्यावर त्यातही शैवाल निर्माण होणारच. यासाठी पाणीपुरवठा करताना जल विभागाला विरंजक पावडर किंवा इतर काही उपाययोजना करणे अनिवार्य ठरते. शैवाल झाले तर पाण्याच्या प्रवाहांमध्येसुद्धा त्याची अडचण निर्माण होते. नागरिकांना पाणीपुरवठा करताना पाण्यात शैवाल होऊ नये किंवा शैवाल नाहीसे व्हावे यासाठी वेगवेगळय़ा उपाययोजना केल्या जातात. त्याच्यातील मुख्य म्हणजे कॉपर सल्फेट, विरंजक पावडर, क्लोरिन यांचा वापर साधारणपणे एक मिलिग्रम प्रति लिटर, एवढय़ा मात्रेत केला जातो. त्याशिवाय इतर काही पद्धतींमध्ये पाण्यात रसायने टाकून अल्ट्रासोनिक तंत्रानेसुद्धा शैवाल नाहीसे केले जाते. सर्वात मुख्य उपाय म्हणजे कुठल्याही तलावात किंवा साचलेल्या पाण्यात फॉस्फरस किंवा नायट्रोजन जाणार नाही याची काळजी घेतल्यास शैवालाचे प्रमाण कमी होऊ शकते. त्याशिवाय ऑक्सिजनेशन केल्यास त्याचा परिणाम शैवाल न होण्यामध्ये होतो. पिण्याच्या पाण्यामध्ये शैवाल वाढल्यास अतिसार (डायरिया), त्वचेचे आणि घशाचे विकार होऊ शकतात. शैवाल होऊ नये म्हणून उपयोजना करताना तलावातील माशांना इजा होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal algae and drinking water dampness water department supplying water ysh
First published on: 08-12-2022 at 00:02 IST