चेन्नई येथील ‘राष्ट्रीय तटीय संशोधन केंद्र’ (नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्च – एनसीसीआर) पृथ्वी-विज्ञान मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असून भारतातील समुद्रकिनाऱ्यांबाबत सक्रिय आहे. येथे समुद्रकिनाऱ्यांच्या समस्यांवर उपाय योजून समुद्रामुळे मिळणारा लाभ वाढविता यावा, म्हणून तज्ज्ञांत समन्वय साधला जातो. त्यासंदर्भातील प्रशिक्षणही दिले जाते. एनसीसीआरने एर्नाकुलममध्ये टेट्रापॉड पुरविल्याने लाटांचे तडाखे सौम्य झाले असून समुद्रकिनाऱ्याची झीज मर्यादित राहिली आहे.

एनसीसीआर समुद्रातील पाणी, किनाऱ्यांवरील वाळूतील जीव यांचे पृथक्करण करते. किनाऱ्यांशी संबंधित समस्यांवरील उपायांच्या यशाचे मूल्यमापनही करते. २००४च्या त्सुनामीनंतर एनसीसीआरने भविष्यातील त्सुनामींची शक्यता, संभाव्य जागा, याबद्दल अभ्यासपूर्ण अहवाल दिला. भारतीय उपग्रहांकडून मिळालेल्या माहितीनुसार १९९०-२०१६ दरम्यान भारतातील समुद्रतटांत कोणते नैसर्गिक आणि मानवनिर्मित बदल घडले याचा अहवाल तयार केला.

indian economy marathi news
UNCTAD: भारताची अर्थव्यवस्था २०२४ मध्ये किती टक्क्यांनी वाढणार? संयुक्त राष्ट्राचा अहवाल जाहीर; व्याजदराचाही उल्लेख!
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

आपल्यासमोरील महासमस्या म्हणजे समुद्रात आणि समुद्रकिनाऱ्यांवर येणारा कचरा! २०१८-२०२१ दरम्यान तिमाही पाहणीत एनसीसीआरला आढळले की यातील ५० टक्के कचरा हा केवळ एकदा वापरलेले प्लास्टिक आहे. प्लास्टिक कचऱ्याच्या उदाहरणातून एनसीसीआरसमोरचे काम केवढे कठीण आहे हे कळते. मानवजात प्लास्टिकच्या नवनव्या वस्तू प्रचंड प्रमाणात बनवणे, खरेदी करणे आणि त्या फेकून नव्या घेणे या चक्रात अडकली आहे. मॅक्रो-मेसो-मायक्रो-नॅनोप्लास्टिक असे कणांच्या आकारानुसार प्लास्टिक-तुकडय़ांचे गट पडतात. प्लास्टिक-कचरा कुजत नाही, साचतो. त्यातील मोठय़ा तुकडय़ांचे छोटे कण होतात. त्यांचा पृष्ठभाग मोठा म्हणून विषारी पदार्थ शोषण्याची क्षमताही जास्त. असे सूक्ष्म कण अन्न-पाण्यातून आपल्यासह सर्व जीवांच्या शरीरात शिरत आहेत. त्यांचे दुष्परिणाम लवकरच दिसू लागतील.   

प्लास्टिकनिर्मितीत घट, वापरावर निर्बंध आणणे, जाणीवजागृतीने पुनर्वापर करणे, स्वयंसेवकांच्या मदतीने किनारे स्वच्छ ठेवणे, असे उपाय अपुरे पडत आहेत. जगभर एनसीसीआरसारख्या संस्थांना बळ मिळाले नाही तर लवकरच समुद्रांतील प्लास्टिकचे प्रमाण माशांपेक्षाही वाढेल. प्लास्टिकने पोटे फुगून जलचरांची भूक मरेल. अन्नाअभावी प्राणी मरतील. कासवांसाठी सुरक्षित अधिवास निर्माण करणे, कांदळवनांचे मन्नारच्या आखातात आणि अन्यत्र असलेल्या प्रवाळिभतींचे, प्रवाळबेटांचे रक्षण व पुनस्र्थापना करणे यासाठी एनसीसीआर तंत्रे-साधने २० वर्षे विकसित करत आहे. मँगेनीजसारखी पोषक द्रव्ये अतिप्रमाणात पाण्यात येऊन शैवालांची अतिरिक्त वाढ होऊन पाण्यातील ऑक्सिजन घटणे, जीवजाती मरणे हीदेखील मोठी समस्या ठरत आहे.

– नारायण वाडदेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org