डॉ. नीलिमा गुंडी

सृष्टीतील विविध घटकांना स्वत:त सामावून घेणारी भाषा विविध वनस्पतींमुळेही सहजपणे बहरत असते. ‘तुळशीपत्र ठेवणे’, या वाक्प्रचाराचा अर्थ आहे हक्क सोडणे, अर्पण करणे. एखाद्या वस्तूवर तुळशीचे पान ठेवून ती वस्तू कृष्णार्पण करण्याची पद्धत आहे. उदा. ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले होते.’

Freedom of press, right to dignity,
वृत्तपत्र स्वातंत्र्याचा वापर प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासाठी नको – उच्च न्यायालय
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
controversy over bjp candidate from north mumbai piyush goyal statement on rehabilitation of slum on salt pan lands
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावरून वादंग; गरीब हटाव हेच भाजपचे धोरण -विरोधकांची टीका, त्याच ठिकाणी घर देण्यासाठी कटिबद्ध -गोयल यांचे प्रत्युत्तर

‘हरभऱ्याच्या झाडावर चढवणे’ म्हणजे खोटी स्तुती करणे. हरभऱ्याचे झाड नाजूक असते, ही वस्तुस्थिती लक्षात घेतली की या वाक्प्रचारातील मर्म लक्षात येईल. आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचा उद्योग केला जातो. व्यक्ती चाणाक्ष असेल, तर ती त्या खोटय़ा स्तुतीला दाद देत नाही. म्हणजेच ती व्यक्ती हरभऱ्याच्या झाडावर चढत नाही!

‘विडा उचलणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग ऐतिहासिक लेखनात आढळतो. विडा करण्यासाठी नागवेलीचे पान वापरतात. मुळात विडय़ांना आपल्याकडे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्व आहे. पूर्वी दरबार बरखास्त करताना, मोहिमेवर जाणाऱ्यास निरोप देताना तबकात मांडलेले विडे देण्याची चाल असे. त्यातून विडा उचलणे हा वाक्प्रचार रूढ झाला. त्याचा अर्थ आहे कठीण आव्हान स्वीकारणे. पुढे प्रत्यक्ष तबकातील विडा न उचलताही या वाक्प्रचाराचा वापर सुरू राहिला. उदा. राम गणेश गडकरी यांनी ‘एकच प्याला’ या नाटकात या वाक्प्रचाराचा उपयोग करून श्लेष साधत विनोदनिर्मिती केली आहे, ती अशी : ‘अमका म्हणतो आजपासून चहा सोडला, तमक्यानं विडासुद्धा न खाण्याचा विडा उचलला!’

‘पळसाला पाने तीन’ हा वाक्प्रचार वस्तुस्थितीदर्शक आहे. लालभडक पाने असलेला पळसाचा वृक्ष त्याच्या तीन पानांच्या वैशिष्टय़पूर्ण रचनेमुळे उठून दिसतो. त्यामुळे स्थलकालनिरपेक्ष समान तत्त्व सांगण्यासाठी हा वाक्प्रचार वापरतात. कोकणात जास्त पाऊस पडतो, म्हणून तिथे पळसाला चार पाने फुटणार नाहीत ! ‘पळस गेला कोकणा, तीन पाने चुकेना’ असे म्हटले जाते.

असे अनेक वाक्प्रचार आढळतील. अंगणातल्या तुळशीपासून जंगलातल्या वृक्षांपर्यंत नाना वनस्पती आपापला स्वभाव व संदर्भविश्व उलगडत वाक्प्रचारांमध्ये रुजल्या आहेत.

nmgundi@gmail.com