मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर देखभाल दुरुस्ती योग्य पद्धतीने न करणाऱ्या ठेकेदार कंपनीविरुद्ध तलासरी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खडबडून जागे झाले आहे. त्या अनुषंगाने देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांमार्फत तलासरी व अपघातप्रवण क्षेत्रातील खड्डे बुजवण्यास आरंभ झाला असला तरी रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली थातूरमातूर मलमपट्टी करण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.तलासरी तालुक्यातील आमगावजवळ सलग दोन दिवशी झालेल्या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी तलासरी पोलिसांनी देखभाल दुरुस्ती करणारी आर.के. जैन कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणानंतर महामार्गावर खड्डे बुजवण्याच्या कामाला आरंभ झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठय़ा प्रमाणात खड्डय़ांचे प्रमाण वाढले आहे. पाऊस सुरू असताना पाणी साचलेल्या खड्डय़ातच खडी-मुरूम-भुकटी टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ असल्याने बुजवलेले खड्डे काही तासांतच उघडे पडत आहेत. ही डागडुजी दिखाव्यासाठी असल्याचा आरोप करण्यात येत आहे.पावसाळय़ात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पडणारे जीवघेणे खड्डे हे नित्याचेच झाले आहे. मात्र हे खड्डे बुजवण्यासाठी लागणारी साधनसामुग्री पावसाळय़ापूर्वी गोळा करण्यास संबंधित ठेकेदार कंपनी अपयशी ठरली आहे. मुरूम माती व खडीने खड्डे बनण्याऐवजी कोल्ड मिक्सद्वारे खड्डे भरणे अभिप्रेत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Against the contractor company for not carrying out maintenance and repairs on the mumbai ahmedabad national highway in a proper manner amy
First published on: 23-09-2022 at 00:05 IST