सार्वजनिक ठिकाणी चित्ररूपाने सामाजिक संदेश

पालघर : स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत पालघर नगर परिषदेने शहराच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे.  सुरुवातीच्या टप्प्यात शहरातील सार्वजनिक व वर्दळीच्या ठिकाणी भिंतींवर  सामाजिक संदेश देणारी चित्रे रेखाटली आहेत. स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या पन्नासात येण्याचा पालघर नगरपरिषदेचा मानस आहे.  यासाठी कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवणे,  पथनाटय़, व्हिडीओ संदेश, समाजमाध्यमांचा पुरेपूर वापर करून स्वच्छ सर्वेक्षण यशस्वी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.  विविध गृहसंकुल व गृहनिर्माण संस्थांमध्ये जाऊन स्वच्छतेचे महत्त्व यावर जागरूकता निर्माण केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात पालघर नगर परिषद  स्वच्छ सर्वेक्षणाच्या निकषांमध्ये येईल, असा विश्वास आहे.

dharavi, dharavi redevelopment project, 100 teams
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार
Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Submerged area of proposed Poshir Dam soil survey to start soon
प्रस्तावित पोशीर धरणाच्या बुडित क्षेत्र, माती सर्वेक्षणाला लवकरच प्रारंभ
Washim District, Massive Cash Seizures, border, Ahead of Elections, IT Department, Probe Rs 20 Lakh, lok sabha 2024, marathi news,
वाशीम : सर्वेक्षण पथकाच्या तपासणीत ३६ लाखाची रोकड जप्त; २० लाख संशयास्पद, आयकर विभागाकडून चौकशी

 पहिल्या टप्प्यामध्ये संपूर्ण शहरांमध्ये भिंती सजवण्याचे काम सुरु आहे.  जनजागृतीपर संदेश  फलकाद्वारे दिले जात आहेत. आरोग्य विभागांतील  स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे धडे, कचरा सफाई कर्मचाऱ्यांना  कचरा वर्गीकरण करण्यासाठी प्रोत्साहन केले जात आहे. यातून शहरामध्ये स्वच्छता नीटनेटकी राहील असे प्रयत्न केले जात आहेत. याचबरोबरीने प्लास्टिक बंदीसाठी विशेष मोहीम  हाती घेतली जाणार आहे.  नगर परिषद कार्यालयाच्या बाजूला कम्पोस्ट खत तयार केले जात आहे. त्यातून नगर परिषदेला काही प्रमाणात महसूलही मिळत आहे. स्वच्छ सर्वेक्षणसाठी पालघर नगर परिषद पुरेपूर प्रयत्न   करताना दिसून येत आहे.

फक्त स्वच्छ सर्वेक्षण नव्हे तर इतर वेळीही पालघर शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पदाधिकारी व प्रशासनाचे प्रयत्न नेहमीच राहातात. आपले शहर म्हणून ते स्वच्छ ठेवण्याची आमची नैतिक जबाबदारी आहे. नागरिकांनी ही नैतिक जबाबदारी ओळखून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी हातभार लावावा.

– उमाकांत पाटील, विभागप्रमुख, आरोग्य खाते, नगर परिषद, पालघर