प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाला जबाबदार असणाऱ्या सूर्य नदीवरील पुलाच्या कठड्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने धक्का शोषण करणार यंत्रणा (क्रॅश अटेन्यूअटर)कार्यान्वित केली आहे. एकीकडे या अपघाताला वाहनाचा मर्यादेपेक्षा अधिक वेग जबाबदार असल्यानेपोलिसात गुन्हा नोंदवला गेला असताना दुसरीकडे महामार्गावरील रचनेत दोष असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीन महिन्यांपूर्वी (४ सप्टेंबर २०२२ रोजी) टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री प्रवास करीत असलेल्या गाडीला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू चारोटी पासून काही अंतरावर सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला आदळली होती. या अपघात समयी सीट बेल्ट परिधान न केल्याने सायरस मिस्त्री व अन्य एका सहप्रवाशाचे निधन झाले होते.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crash attenuater installed at cryus mistry accident spot zws
First published on: 05-12-2022 at 10:37 IST