पालघर/ डहाणू : डहाणू तालुक्यात पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी डहाणू नगर परिषदेने आठ महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करत महोत्सवाचे आयोजन केले होते. परंतु आठ महिन्यांनंतर विकासाच्या दृष्टीने कोणतीही हालचाल न दिसल्यामुळे हा महोत्सव केवळ देखावाच राहिला, अशी टीका निसर्गप्रेमी आणि पर्यटकांकडून सुरू झाली आहे. महोत्सवावरील ४४ लाख रुपये वाया गेल्याचे म्हटले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्याला ११२ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून मुंबई, नाशिकसह गुजरात राज्यातून पर्यटक किनाऱ्यावर येत असतात. मात्र समुद्रकिनारी आवश्यक सोयी-सुविधांच्या अभावामुळे पर्यटकांनी डहाणू समुद्रकिनाऱ्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. मार्चच्या मध्यावर पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी डहाणू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी नगर परिषदेने सुमारे ४४ लाख रुपये  खर्च केले होते. मात्र आठ महिन्यानंतरही विकासाच्या दृष्टीने कोणतेही पाऊल पडलेले दिसत नाही.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahanu festival 2022 tourists ignore to visit dahanu beach due to lack of necessary facilities zws
First published on: 03-12-2022 at 05:09 IST