कासा : आशागड ग्रामपंचायत हद्दीत आंबेसरी धुंदळवाडी रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटण्यात आली आहेत. या दुकानांसमोर रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यामुळे वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत. डहाणूच्या आशागड-आंबेसरी-धुंदलवाडी राज्य मार्गाचे नुकतेच नूतनीकरण झाले आहे. हा रस्ता मुंबई-अहमदाबाद महामार्गाकडे जाण्यासाठी सोयीचा आहे. मात्र, या मार्गावरील आशागड गाव हद्दीत रस्त्यालगत किराणा, भांडी विक्री दुकाने, भाजीपाला आणि फळ विक्रेते, चिकन सेंटर तसेच कडधान्यांचे ठेले लावले जात आहेत. शिवाय रस्त्यावर रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

वाहतुकीचा खोळंबा

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
bmc will take permission from ec for potholes filling
मुंबई: खड्डे भरण्याच्या कामासाठीही निवडणूक आयोगाची परवानगी घेणार; पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करणार
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

ग्रामस्थांना रस्ता ओलांडण्यात अडचणी येत आहेत. मार्गाच्या दोन्ही बाजूला कोणतेही अंतर न सोडता काही कच्ची आणि पक्की दुकाने उभारली जात आहेत. त्यामुळे या मार्गावर बरीच वाहने खोळंबून राहतात. डहाणू चारोटी राज्यमार्गावर दिवसभर दुकाने लावली जात आहेत. मात्र, या साऱ्या प्रकाराकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत.