वाडा : कोरडवाहू शेतजमिनीला बारमाही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वाडा तालुक्यातील डाहेतील माती बंधाऱ्याचे काम ३२ वर्षांपासून विविध कारणांमुळे बंद पडले आहे. त्यामुळे परिसरातील सहा गावांतील शेतकऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले आहे. या सिंचन प्रकल्पात साठा होणारे पाणी लांब अंतरावर नेण्यासाठी कालव्यांसाठीही जमीन संपादित करून कालवा खोदाईचे काम हाती घेतले होते. मात्र, त्यानंतर काही काळाने या प्रकल्पाला वनखात्याने विरोध केल्याने काम थांबविण्यात आले. त्यानंतर आजतागायत या बंधाऱ्याचे काम ठप्पच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या वनजमिनीसाठी सुधारित अंदाजपत्रक बनविण्यात आले आहे. या जमिनीची रक्कम  वनखात्याकडे वर्ग करावी लागणार असल्याची माहिती लघुसिंचन उपविभाग सूर्यानगर यांच्याकडून देण्यात आली आहे. शेतकरी या प्रकल्पाच्या पूर्ततेची वाट पाहात आहेत. या प्रकल्पाचे अर्धवट काम  सुरू करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी  जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे, परंतु आजतागायत कुणी दखल घेतली नाही, असे येथील स्थानिक शेतकरी जगदीश कोकाटे यांनी सांगितले.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest department water policy opposition forest administration the work dam ysh
First published on: 19-11-2022 at 00:02 IST