रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर: सुरक्षा यंत्रणेच्या त्रुटींमुळे पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात विजय वल्लभ रुग्णालयात १५ निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असताना दुसरीकडे खासगी रुग्णालय उभारणीसाठीच्या कायदेशीर नियमांना बगल देऊन जिल्ह्यात  रुग्णालये उभारली जात आहेत.  त्यामुळे रुग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालघर शहरासह अनेक ठिकाणी नियमानुसार कागदपत्रे नसतानाही अनेक रुग्णालयांना जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत रुग्णालय सुरू करण्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.  शहरातील चार रस्ता छत्रपती शिवाजी चौक परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीमध्ये असेच रुग्णालय सुरू आहे. करोना रुग्णालयाच्या नावाखाली येथे इतर रुग्णसेवा पुरवल्या जात आहेत. या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र नसताना हे रुग्णालय व त्याच्या बाजूला निदान केंद्र सुरू असल्याची  माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे रुग्णालय उभारताना आवश्यक असलेल्या परवानग्या न तपासता  रुग्णालय सुरू करण्याचे प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत रुग्णालयाला देण्यात आले आहे. 

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ignoring legal rules setting private hospital ysh
First published on: 19-01-2022 at 00:57 IST