नीरज राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर जिल्ह्यात सध्या मुंबई-बडोदा द्रुतगती मार्ग, बुलेट ट्रेन प्रकल्प, समर्पित मालवाहू मार्ग तसेच विरार-डहाणू रोड पश्चिम रेल्वेचे चौपदरीकरण, असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांसाठी भूसंपादन अंतिम टप्प्यात असून, त्यात दलालांनी उच्छाद मांडला आहे. भूसंपादन प्रक्रियेत काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरप्रकार करण्यात आल्याचे आरोप जिल्ह्यातील आमदारांनी विधिमंडळात केले. याप्रकरणी विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. राज्य सरकारने या प्रकरणात चौकशी करण्याचे मान्य केल्याने जमीनमालकांना न्याय मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irregularities in land acquisition for ambitious project in palghar district zws
First published on: 24-03-2023 at 01:04 IST