स्वातंत्र्यलढय़ादरम्यान १४ ऑगस्ट १९४२ रोजी पालघर येथे झालेल्या आंदोलनात हौतात्म्य पत्करणाऱ्या पाच जणांपैकी रामचंद्र चुरी यांना अखेर ८० वर्षांनंतर चेहऱ्याची ओळख मिळाली. चुरी यांचे छायाचित्र, तैलचित्र नसल्यामुळे गेली अनेक वर्षे त्यांना अशीच आदरांजली अर्पण केली जात होती. नातलग आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचे तैलचित्र बनवण्यात आले. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या तैलचित्राची परवानगी लालफितीत अडकली होती. त्याला अखेर मान्यता मिळाली असून येत्या शुक्रवारी (१२ ऑगस्ट) या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिटिश राजवटीविरोधात १९४२ साली पुकारलेल्या चलेजाव आंदोलनादरम्यान पालघर येथे १४ ऑगस्ट १९४२ रोजी काढलेल्या मोर्चावर झालेल्या गोळीबारात पाच जण हुतात्मा झाले. रामप्रकाश भीमाशंकर तिवारी (पालघर), काशिनाथ हरी पागधरे (सातपाटी), गोविंद गणेश ठाकूर (नांदगाव), सुकुर गोविंद मोरे (शिरगाव) तसेच रामचंद्र माधव चुरी यांनी या आंदोलनात बलिदान दिले. त्यांच्या त्यागाची आठवण म्हणून १४ ऑगस्ट १९४४ रोजी पालघरमध्ये हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Martyr oil painting gets official approval after three years amy
First published on: 11-08-2022 at 00:02 IST