पालघर/ बोईसर : मुंबई -अहमदाबाद दरम्यान रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस गाडय़ांमुळे माार्गावर येणाऱ्या गुरांचा अपघात टाळण्यासाठी या मार्गावर कुंपण टाकण्याचे रेल्वे प्रशासनाने योजिले आहे. ही स्वागतार्ह बाब असली  तरी २०१३ पासून घोषित  उपनगरीय क्षेत्रातील पायाभूत सुविधांकडे रेल्वेने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे उपनगरीय प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर  आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम रेल्वेच्या ६२२ किलोमीटर मार्गावर दोन्ही बाजूने मेटल बीमचे कुंपण घालण्यात येणार आहे. एकूण २४५.२६ कोटींच्या या कामाची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी केली असून मे २०२३ पर्यंत हे कुंपणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.   यासाठी निविदा प्रक्रिया जारी करण्यात आली असल्याचे रेल्वेतर्फे माहिती देण्यात आली आहे. या चांगल्या गोष्टी घडत असताना वैतरणा ते डहाणू दरम्यान रेल्वे स्थानक वाढत्या गर्दीच्या अनुषंगाने पादचारी जिने, सरकते जिने, उद्वाहन, शौचालय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, इंडिकेटर, कोच पोजिशन इंडिकेटर इत्यादी सुविधा  अपूर्ण आहेत, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.  

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railways fencing track to prevent cattle zws
First published on: 02-02-2023 at 19:59 IST