scorecardresearch

पालघर: पानेरी ओहळ झाला रंगीत, शेतकरी व मच्छीमार मध्ये चिंतेचे ढग

पालघर व माहीम दरम्यान वाहणाऱ्या पानेरी ओहळा मध्ये रासायनिक सांडपाणी अथवा रसायन मिसळल्याने संपूर्ण ओहळातील पाणी तपकिरी रंगाचे झाले आहे.

palghar
पालघर: पानेरी ओहळ झाला रंगीत, शेतकरी व मच्छीमार मध्ये चिंतेचे ढग

पालघर व माहीम दरम्यान वाहणाऱ्या पानेरी ओहळा मध्ये रासायनिक सांडपाणी अथवा रसायन मिसळल्याने संपूर्ण ओहळातील पाणी तपकिरी रंगाचे झाले आहे. या ओहळावर अवलंबून असणाऱ्या बागायतदार व वडराई खाडीकिनारी मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.केळवे रोड येथून उगम होणाऱ्या या पानेरी ओहळ हा पिडको औद्योगिक वसाहत व पुढे पालघर नगरपरिषद, माहीम गावातून वाहून वडराई येथे समुद्राला मिळतो. या ओहळावर माहीम परिसरातील अनेक बागायतदार मार्च महिन्यापर्यंत अवलंबून राहत असून भाजीपाला मिरची, काकडी, कारली इत्यादी लागवड करीत असतात. शिवाय खाडी परिसरात या ओहळात असणाऱ्या लहान मासांवर अनेक मच्छीमार बांधव आपली उपजीविका करत असतात.

माहीम (रेवाळे) येथील प्रतीक वर्तक हे आज सायंकाळी घरी परतत असताना पाणेरी मधील पाण्याचा रंग बदलण्याचे त्यांना आढळून आले. या संदर्भात माहीम येथून अनेका नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मुंबई येथे कार्यालयीन कामकाजासाठी गेल्याचे सांगण्यात आले. पिडको औद्योगिक वसाहती मधील एखाद्या उद्योगाने रंग (डाय) अथवा रासायनिक घनकचरा अथवा सांडपाणी ओहळात सोडल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून यामुळे संपूर्ण ओव्हाळातील जैवविविधता नष्ट झाली असावी असे माहीम येथील ग्रामस्थांनी शक्यता व्यक्त केली आहे.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान
supriya sule on pankaja munde
पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”

हेही वाचा >>>‘बुलेट ट्रेन’मुळे जंगल दुरावले, विकासापासूनही वंचित

पणेरी ओहळातील प्रदूषणाच्या विरुद्ध ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून आवाज उठवला असून पणेरी बचाव संघर्ष समिती व त्यापूर्वी ग्रामस्थांनी अनेक आंदोलन केली आहेत. असे असले तरी प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच जिल्हा प्रशासनाकडून पालघर येथील उद्योगांमधील प्रदूषण रोखण्याकडे कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी वीरेंद्र सिंग यांच्याशी संपर्क साधला असता ओहळ पात्रातील पाण्याचे नमुने तातडीने घेण्याची व्यवस्था करण्यात येईल असे सांगितले. तसेच मुंबई येथे कार्यालयात असल्याने या ठिकाणी आपण स्वतः उद्या सकाळी पाहणी करू असे त्यांनी लोकसत्तेला सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-09-2023 at 19:40 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×