पालघर : जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यातील अनेक आदिवासी बांधवांना १३ डिसेंबर २००५ मध्ये आपल्या वहिवाटीत व कब्जात असणारे क्षेत्र वन पट्टय़ाच्या रूपाने देण्याऐवजी तुटपुंज्या क्षेत्रफळ वन पट्टय़ांच्या रूपाने देण्यात आले. त्यामुळे आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध येथील सुमारे दोन हजार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वन हक्क कायदा अस्तित्वात आल्यानंतर आपल्या कब्जात किंवा वहिवाटीत असणारी जागा वन पट्टे रूपाने आदिवासी शेतकऱ्यांना देण्याचे शासनाने मान्य केले होते. त्यानुसार ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांनी ताब्यातील जागेचे अंदाजे मोजमाप घेऊन ग्रामसभेच्या ठरावामार्फत ही माहिती उपविभागीय अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवली होती. मात्र प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता वन विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी वन पट्टय़ाचे वाटप केले. त्यावेळी कब्जात असणाऱ्या क्षेत्रफळाऐवजी कमी क्षेत्रफळ मिळाल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्याला शासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ऑगस्ट २०१३मध्ये वयम् संस्थेच्या मदतीने सुमारे १३५० शेतकऱ्यांनी माहिती सत्याग्रह केला आणि क्षेत्रफळ कमी करण्याच्या निर्णयाच्यावेळी आधार म्हणून वापरलेल्या पुराव्यांची मागणी केली. मात्र अपिलादरम्यान सबळ पुरावे देण्याऐवजी वन विभागाच्या अभिप्रायानुसार क्षेत्रफळ कमी केले असल्याचे सांगण्यात आले.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tribals fight for rightful forest area amy
First published on: 04-10-2022 at 00:06 IST