वाडा:  वाडय़ातील एकमेव असलेली  स्मशानभूमी कचऱ्याच्या विळख्यात सापडली आहे. एखाद्या मृत व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी येथे नेताना अक्षरश: कचरा तुडवत न्यावे लागते. अशी परिस्थिती असतानाही हा कचरा उचलण्याकडे वाडा नगरपंचायत दुर्लक्ष करीत असल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाडा शहराची ३५ हजारांहून अधिक लोकसंख्या आहे.  वाडा शहरासाठी सिद्धेश्वरी येथे वैतरणा नदीकिनारी वाडा नगरपंचायतीच्या मालकीची एकमेव स्मशानभूमी आहे.  येथील लोखंडी कठडय़ासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी खांबावर चोरटय़ांनी डल्ला मारला आहे. यामुळे मृत व्यक्तीवर अंतिम संस्कार करण्यास येथे अडचणी येत आहेत. असे असताना आता या स्मशानभुमीलाच येथील नगरपंचायतीच्याच  कचराभुमीचा विळखा बसला आहे.    कचरा या ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीपर्यंत पोहचला  आहे.  बुधवारी वाडा शहरात एका व्यक्तींचे निधन झाले. त्यांना येथील स्मशानभूमीत घेऊन  जाताना नातेवाईक, ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागली होती. कचऱ्यातून वाट काढताना अंत्यविधीसाठी बाहेरगावाहून आलेल्या नातेवाईकांनी नगरपंचायत प्रशासन व पदाधिकारी यांच्या विरोधात संताप व्यक्त केला होता.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Walk cemetery neglect wada nagar panchayat administration funeral situation ysh
First published on: 09-12-2022 at 00:02 IST