पालघर: पश्चिम रेल्वेच्या विरार वैतरणा दरम्यान असलेल्या ९० क्रमांकाच्या रेल्वे पुलावर ओव्हरहेड वायर जाणारा खांब कोसळल्यामुळे गेल्या दोन तासापासून मुंबईकडे जाणारी लांब पल्ल्याची व लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.दुपारी दोन वाजेच्या सुमारास विरार वैतरणा दरम्यान असलेल्या कचराळी या ९० क्रमांकाच्या पुलावर ओव्हरहेड वायर नेणारा खांब मुळापासून खाली कोसळला.या घटनेआधी जोधपूर एक्सप्रेस गेल्याने अनर्थ टळला.

या प्रकारामुळे ओव्हरहेड लाईनचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला. ओव्हरहेड वायर नेणारा खांब कोसळल्याची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्यात येत आहे
यामुळे गुजरात व डहाणू कडून जाणारी लोकल सेवा तब्बल दोन तासापासून पूर्णपणे ठप्प आहे तर मुंबईहून गुजरात कडे जाणारी रेल्वे सेवा काही वेळ उशिराने धावत आहेत, अशी माहिती डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या प्रतिनिधींनी दिली आहे.

megablock
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे – लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द, काही उशिराने धावणार
thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
3 year old girl fall to death into a pothole on highway near titwala
टिटवाळ्याजवळ महामार्गाच्या खड्ड्यात पडून बालिकेचा मृत्यू
Jamtara Train accident
झारखंडच्या जामतारा स्थानकाजवळ मोठी दुर्घटना, रेल्वेची १२ प्रवाशांना धडक, दोन जणांचा मृत्यू