
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा १४ एप्रिल रोजी विवाह झाला. मुंबईतच लग्नानंतर रिसेप्शनही पार पडले. (फोटो: indian express)

लग्नाचे सर्व कार्यक्रम उरकून दोन्ही कलाकार आपापल्या कामावर परतले आहेत. दोघांनी हनिमूनपेक्षा कामाला प्राधान्य दिले.(फोटो: indian express)

याआधीही असे अनेक सिनेस्टार्स आहेत ज्यांनी आपल्या कामाला पहिले प्राधान्य देत हनिमूनला पुढे ढकलले आहे. अशा कलाकारांची नावे जाणून घेऊया.(फोटो: indian express)

शाहरुख खानने असेही सांगितले आहे की गौरीसोबत लग्न केल्यानंतर लवकरच तो ये दिल आशना हैच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला आहे. (फोटो: indian express)

नोव्हेंबर २०२१ मध्ये पत्रलेखाशी लग्न केल्यानंतर, राजकुमार रावने हनीमूनला न जाता कामाला प्राधान्य दिले. आतापर्यंत हे जोडपे हनिमूनला जाऊ शकलेले नाही.(फोटो: indian express)

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे डिसेंबर २०२१ मध्ये लग्न झाले. लग्नाच्या दोन-तीन दिवसानंतर दोन्ही कलाकार कामावर परतले. लग्नाच्या सुमारे ३ महिन्यांनंतर विकी आणि कतरिना हनीमूनला गेले.(फोटो: indian express)

शीतल ठाकूरसोबत लग्न झाल्यानंतर दोन दिवसांनी विक्रांत मॅसी लव्ह हॉस्टेलच्या सेटवर परतला. विक्रांतनेही हनिमूनऐवजी आपल्या प्रोफेशनला प्राधान्य दिले.(फोटो: indian express)

शिबानी दांडेकरसोबत लग्न केल्यानंतर फरहान अख्तरनेही हनीमून पुढे ढकलला आणि शूटिंगमध्ये व्यस्त झाला.(फोटो: indian express)

झिरो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विराट कोहलीसोबत लग्नानंतर अनुष्का शर्मानेही तिचा हनीमून पुढे ढकलला होता. विराट कोहलीही त्या काळात क्रिकेटमध्ये व्यस्त होता.(फोटो: indian express)