-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. यामुळे अनेकदा एकापेक्षा जास्त ग्रह एकाच राशीत आल्याने शुभ-अशुभ योग निर्माण होतात.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
असे योग प्रत्येक महिन्यात कोणताना कोणतातरी राशीत निर्माण होतात. जून महिन्यातही ग्रहांचा राजा सूर्य आणि देवगुरू बृहस्पती यांची मिथुन राशीत युती निर्माण होणार आहे.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
पंचांगानुसार, १४ मे रोजी देवगुरू मिथुन राशीत प्रवेश करणार असून १५ जून रोजी सूर्य या राशीत प्रवेश करेल. त्यानंतर ही युती निर्माण होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
या युतीला ज्योतिषशास्त्रात गुरू आदित्य राजयोग म्हटले जाते. या राजयोगाच्या प्रभावाने १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गुरू आदित्य राजयोग मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी गुरू आदित्य राजयोग खूप भाग्यशाली ठरेल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल.आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मीन राशीच्या व्यक्तींसाठी देखील गुरू आदित्य राजयोग खूप सकारात्मक ठरेल. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ढाब्यावर जेवणासाठी थांबलेल्या सैनिकांना पाहून लोकांनी केलं असं काही की….; VIDEO पाहून तुमचीही छाती अभिमानाने फुलेल