-
पावसाळा म्हणजे थोडा थांबण्याचा, स्वतःकडे पाहण्याचा आणि नव्याने ऊर्जा मिळवण्याचा काळ. कोसळणाऱ्या सरींमध्ये मन प्रसन्न होतं, पण तसेच ते चिंतेचंही कारण होऊ शकतं. अशा वेळी काही साधे, पण प्रभावी उपाय तुमचं मन शांत ठेवण्यास मदत करू शकतात. जाणून घ्या, पावसाळ्यात मन आणि शरीर डिटॉक्स करणारी ही खास नऊ अनुष्ठानं : (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
१. कोपऱ्यांची स्वच्छता, मनाची विश्रांती
पावसाळ्याच्या सुस्त वातावरणात घरातील एक कोपरा सजवणं जसं एखादं टेबल, खिडकीजवळची जागा मनाला आश्वस्त करतं. सुटसुटीत, स्वच्छ जागा मनःशांतीस पूरक ठरते. (छायाचित्र: अनस्प्लॅश) -
२. झाडांच्या सहवासात फेरफटका
छत्री घेऊन परिसरात फेरफटका मारा. पावसानं धुतलेली झाडं, निळसर आकाश आणि मातीचा सुगंध यानेंमन ताजं होतं. ही चाल म्हणजे एक नैसर्गिक थेरपीच! (छायाचित्र: अनस्प्लॅश) -
३. श्वासाचा जादुई व्यायाम
‘४-७-८’ श्वसन तंत्र वापरून काही मिनिटांत तणाव कमी करता येतो. चार सेकंद श्वास घ्या, सात सेकंदं रोखा व आठ सेकंदांत सोडा. हे साधं तंत्र चमत्कारी परिणाम देते. (छायाचित्र: अनस्प्लॅश) -
४. फोनपासून जरा वेळ लांब राहा
थोडा वेळ मोबाईल, सोशल मीडिया, टीव्हीपासून दूर राहा. हा डिजिटल डिटॉक्स मनाला शांत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. (छायाचित्र: अनस्प्लॅश) -
५. सुगंधांनी घरात शांततेचं वातावरण निर्माण करा.
लव्हेंडर किंवा लिंबूवर्गीय सुगंध वापरून घरात अरोमा थेरपीचा अनुभव घ्या. या सुगंधांचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. चिंता कमी होते. (छायाचित्र: अनस्प्लॅश) -
६. गरम पाण्याचं आरामदायक स्नान
पावसाळ्यात गरम पाण्यानं अंघोळ करताना मंद प्रकाश, सौम्य संगीत यांचा समावेश करा. हा अनुभव थेट ‘स्पा’सारखा वाटतो आणि शरीरासोबत मनही निवते. (छायाचित्र: अनस्प्लॅश) -
७. जर्नलमध्ये भावनांचं प्रतिबिंब
आपल्या भावना, आठवणी, कृतज्ञता व स्वप्नं लिहून काढणं हे ताण कमी करतं, आत्मपरीक्षणाला चालना देतं. (छायाचित्र: अनस्प्लॅश) -
८. सेंद्रिय आहाराची निवड
पावसाळ्यात ताज्या फळांचा, भाज्यांचा समावेश असलेला आहार शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो आणि मेंदूला पोषण पुरवतो. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान