-
वजन कमी करण्याचा किंवा ‘डाएट’चा प्रयत्न करणारे लोक अनेकदा त्यांच्या आहारातून तूप आणि स्वयंपाकाचे तेल काढून टाकतात. कॅलरीज कमी करण्याचा हा एक सोपा मार्ग वाटत असला तरी पोषणतज्ज्ञ सल्ला देतात की, सर्व चरबी काढून टाकल्याने शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडू शकते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
कोणत्या पोषक घटकांच्या अभावामुळे कोणती लक्षणे दिसू शकतात ते जाणून घ्या. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
जेव्हा तुम्ही आहारातून तूप आणि तेल पूर्णपणे काढून टाकता तेव्हा तुम्ही जीवनसत्त्वे अ, ड, ई व के यांचे शोषण कमी करता. आहारातील चरबीशिवाय शरीराला हे पोषक घटक वापरता येत नाहीत. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
हे जीवनसत्त्वे डोळ्यांचे आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती, हाडांची ताकद, अँटिऑक्सिडंट संरक्षण व रक्त गोठण्यास मदत करतात. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
त्यामुळे संतुलित चरबी ओमेगा-३ व ओमेगा-६ यांसारख्या आवश्यक फॅटी अॅसिड्सदेखील पुरवठा करते, जी शरीर स्वतः बनवू शकत नाही. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
मेंदूचे कार्य, हार्मोन्स, पेशींची अखंडता व जळजळ नियंत्रण यांसाठी त्यांचे महत्त्व आहे. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
तेलमुक्त किंवा चरबीमुक्त आहार तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतो का? ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
दीर्घकाळपर्यंत चरबीमुक्त आहार घेतल्याने हार्मोन्सचे उत्पादन बिघडणे, प्रजनन आरोग्यावर विपरीत परिणाम होणे व मज्जासंस्था कमकुवत होणे या गोष्टी घडतात.( फोटो स्रोत : पेक्सेल )
“१०० कॅमेरे असताना तुम्ही…”, अनुश्री मानेबद्दल स्पष्टच बोलला धनंजय पोवार; म्हणाला, “आता रितेश सरांनी…”