-
मिठाच्या पाण्यापासून ते व्हिनेगरमध्ये भिजवण्यापर्यंत, स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी भाज्या आणि फळांमधून कीटकनाशक आणि जंतू काढून टाकण्यासाठी स्वयंपाकघरातील सोप्या पद्धती तुम्हाला मदत करू शकतात. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
शेतीमध्ये रसायनांचा वापर केला जातो. विशेषतः भाज्यांमध्ये, पेरणीपासून ते कापणीपर्यंत, पिकांवर अनेकदा कीटकनाशके वापरली जातात, जी कालांतराने आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात. भाज्या खरेदी केल्यावर खाण्यासाठी वापरण्यापूर्वी तुम्ही त्यांची रासायनिकता कशी कमी करू शकता? येथे जाणून घ्या. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
बरेच लोक भाज्या शिजवण्यापूर्वी लगेच धुऊन टाकतात. परंतु, कीटकनाशके आणि जंतू काढून टाकण्यासाठी केवळ भाज्यांवरील पृष्ठभाग धुणे पुरेसे नसते. तर, भाज्या घरी आणताच व्यवस्थित स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
खारे पाणी : भाज्या आणि फळांमध्ये जंतू आणि रासायनिक घटक असू शकतात. त्यांना मिठाच्या पाण्यात थोडा वेळ भिजवून ठेवल्याने घाण काढून टाकण्यास आणि सूक्ष्मजंतू नष्ट होण्यास मदत होते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
लिंबाचा रस: लिंबाचा रस, पांढरे व्हिनेगर व पाणी हे तिन्ही घटक एकत्र मिसळा आणि त्यात भाज्या धुवा. जीवाणूंचे प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही भाज्या उकळत्या पाण्यात सुमारे तीन मिनिटे भिजवत ठेवू शकता. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
थंड पाण्याने धुवा: भाज्या वाहत्या पाण्याखाली ३० सेकंद धुवा. नंतर त्या थंड पाण्यात पाच मिनिटे भिजवा. पालेभाज्यांना जास्त वेळ भिजवावे लागते. दोन ते तीन वेळा पाणी बदलावे लागते. फळे पूर्णपणे धुऊन घ्या. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
व्हिनेगरच्या मिश्रणात भिजवणे: भाज्यांना दूषित करणारे हट्टी घटक नाहीसे करण्यासाठी, भाज्या ९०% पाण्यात आणि १०% व्हिनेगरच्या मिश्रणात २० मिनिटे भिजवत ठेवा. त्यानंतर त्या भाज्यांमधील रासायनिक घटक कमी करण्यासाठी त्या चांगल्या व्यवस्थित धुऊन घ्या. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
