-
कीटकांपासून मुक्त होण्यासाठी बाजारात रासायनिक कीटकनाशके उपलब्ध असली तरी ती महाग आहेत आणि पर्यावरणासाठीही चांगली नाहीत. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
नैसर्गिक कीटकनाशके बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक लिंबू ६ ते ७ मिरच्या लसणाच्या काही पाकळ्या प्लास्टिक किंवा काचेची बाटली ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
हे कीटकनाशक बनवण्यासाठी लिंबू आणि मिरची आवश्यक आहेत. जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात कुजलेल्या मिरच्या आणि लिंबू कचरा म्हणून टाकत असाल, तर तुम्ही त्यांचा वापर कीटकनाशक बनवण्यासाठी करू शकता. म्हणून तुम्ही ताजे लिंबू आणि मिरच्या खरेदी करणे आवश्यक नाही. कचऱ्यापासून वनस्पतींसाठी द्रावणदेखील बनवू शकता. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
लिंबाचा आम्लयुक्त घटक आणि मिरचीचा तिखटपणा कीटकांना वनस्पतींपासून दूर ठेवण्यास मदत करतो. कारण- कीटक त्यांना सहन करू शकत नाहीत. याचा सर्वात चांगला भाग म्हणजे तो पूर्णपणे किफायतशीर आहे. तुम्हाला बाहेरून काहीही खरेदी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही स्वयंपाकघरातील कचऱ्यापासून कीटकनाशकदेखील बनवू शकता. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
कृती एक रिकामी प्लास्टिक किंवा काचेची बाटली घ्या. एक ताजे किंवा खराब झालेले लिंबू व मिरचीचे छोटे छोटे तुकडे करा आणि ते बाटलीत टाका. लिंबू आणि मिरचीचे छोटे तुकडे करून टाकल्याने त्याचे गुणधर्म पाण्यात सहजपणे उतरतात. हे तुकडे टाकल्यानंतर बाटली पाण्याने भरा. तुम्ही लसणाच्या चिरलेल्या पाकळ्यादेखील वापरू शकता. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
तुम्हाला बाटलीवर झाकण ठेवावे लागेल आणि ते चार ते पाच तास किंवा रात्रभर तसेच राहू द्या. कारण- मिरच्यांचा तिखटपणा आणि लिंबामधील आम्ल पाण्यात पूर्णपणे सक्रिय होण्यासाठी थोडा वेळ लागतो. या काळात पाण्याचा रंग बदलेल आणि त्याला तिखट वास येईल. हा वास झाडांपासून कीटकांना दूर ठेवण्यास मदत करतो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
अपेक्षित वेळेनंतर अर्क गाळून घ्या आणि तो साध्या पाण्यात मिसळा. एक भाग अर्क आणि तीन भाग साध्या पाणी, असे प्रमाण ठेवा. आता तयार झालेल्या या कीटकनाशकाची सकाळी लवकर किंवा सूर्यास्तानंतर तुमच्या झाडांवर फवारणी करा. तेजस्वी सूर्यप्रकाशात फवारणी केल्याने पाने जळू शकतात. फवारणी करताना, पानांच्या खालच्या बाजूवर लक्ष केंद्रित करा. या कीटकनाशकाची आठवड्यातून एकदा नियमितपणे फवारणी केल्याने झाडांवर कीटकांना परत येण्यापासून रोखता येईल. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
अजित दादांबरोबर विमान अपघातात मृत्यु पावलेल्या विदीप जाधवांच्या अपघात विम्याचे काय झाले ? किती कोटींचा होता विमा ?
