-
पावसाळ्यात वाढत्या आर्द्रतेमुळे फळे आणि भाज्या दूषित होऊन आजार पसरण्याचा धोका १० पटीने वाढतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
‘THIP’ च्या न्यूट्रिशनिस्ट गरिमा देव वर्मन यांच्या मते, या वातावरणात बॅक्टेरिया व बुरशी वेगाने वाढल्याने काही अन्नपदार्थ टाळणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
पावसाळ्याच्या दिवसांत वाढत्या आर्द्रतेमुळे पालक, कोबी आणि स्पष्ट दिसणाऱ्या पालेभाज्यांमध्ये बॅक्टेरिया व परजीवींची (पॅरासाइट्स) वाढ होऊन पचनसंस्थेचे आजार उद्भवू शकतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
भाज्यांमधील कीटकनाशकांचा प्रभाव कमी करण्यासाठी त्या व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा मिसळलेल्या पाण्यात काही वेळ भिजवून ठेवाव्यात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
फळे आणि भाज्यांच्या बाहेरील सालीवर कीटकनाशकांचे प्रमाण जास्त असल्याने शक्य असल्यास त्यांची साले काढूनच वापर करावा. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
पावसाळ्यात पालेभाज्यांऐवजी दुधी भोपळा, पडवळ, शिराळी आणि टिंडोरा अशा वेलवर्गीय भाज्यांचा आहारात समावेश करणे अधिक फायदेशीर ठरते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
कच्च्या भाज्यांमध्ये सक्रिय बॅक्टेरिया आणि व्हायरस असू शकतात, त्यामुळे पावसाळ्यात कच्चे सॅलेड खाण्याऐवजी भाज्या वाफवून किंवा शिजवून खाव्यात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
सर्व फळे आणि भाज्या वाहत्या थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्यात, तसेच कडक सालीच्या भाज्यांवरील माती व कीटकनाशके घालवण्यासाठी व्हेजिटेबल ब्रशचा वापर करावा. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)