
श्रीक्षेत्र देहू येथे रविवारी जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळा साजरा करण्यात आला.

दोन वर्षांच्या खंडानंतर प्रथमच भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.

तुकोबांच्या या सोहळ्यास सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने वारकरी देहूनगरीत आले होते.

रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता गोपाळपुऱ्यात नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून आणि मनोभावे हात जोडत भाविकांनी इंद्रायणीच्या काठी भक्तिचैतन्य फुलविले.

सकाळी मुख्य मंदिरातून गोपाळपुऱ्यात जाण्यासाठी महाद्वारातून पालखी बाहेर पडली.

त्या वेळी टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांनी भक्तिकल्लोळ केला. (सर्व छायाचित्र – राजेश स्टीफन)