
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा काल (२९ जुलै) राजीनामा दिला. जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधल्यानंतर रात्री उशिरा त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात आलं. शिवसेनेचे ३९ आणि अपक्ष ९ आमदार शिंदे गटात असल्यामुळे ठाकरे सरकार अखेर कोसळलं.

२०१९च्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या सत्तापेचात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि मुख्यमंत्री पदाची धुरा उद्धव ठाकरेंकडे आली.

उद्धव ठाकरेंच्या रुपाने शिवसेनेला तिसरा तर ठाकरे घराण्याला पहिला मुख्यमंत्री मिळाला.

उद्धव ठाकरे हे अतिशय संयमी, मितभाषी, आणि मृदू स्वभावाचे राजकारणी आहेत.

राजकारणात त्यांना फारसा रस नव्हता. राजकारणात येण्याआधी एक छायाचित्रकार आणि लेखक म्हणून काम करायचे.

राजकारणात त्यांनी कधीच सक्रीय सहभाग नोंदवला नाही पण सामना वृत्तपत्राच्या संपादनाच्या माध्यमातून ते अप्रत्यक्षरित्या राजकारणाच्या सानिध्यात होते.

११९७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीतून उद्धव ठाकरे यांनी अधिकृतरीत्या राजकारणात पाय ठेवला.

त्यानंतरच्या २००२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंवर सोपवली.

२००३ साली बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचे कार्याध्यक्ष पद सोपवले.

बाळासाहेबांनंतर शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरेंनी सांभाळली.

२००६ साली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे ते संपादक झाले.

२०१९मध्ये झालेल्या राजकीय नाट्यानंतर शिवसेना-भाजपा युती तुटली. शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.

२८ नोव्हेंबर २०१९ रोजी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

ते महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री होते. त्यांच्या निमित्ताने संयमी, मितभाषी पण तितकाच आक्रमक मुख्यमंत्री राज्याला मिळाला.

त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात त्यांनी जनतेला आणि प्रशासनाला विश्वासात घेऊन काम केले.

सरकार अल्पमतात आल्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. (सर्व फोटो : उद्धव ठाकरे/ फेसबुक)