-
देशात १८ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे.
-
भाजपाकडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी देण्यात आली आहे.
-
तर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत.
-
राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यास काश्मीर प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देण्यासोबतच सीएए कायद्याबद्दलही सिन्हा यांनी वक्तव्य केले आहे.
-
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून उमेदवारी मिळालेल्या यशवंत सिन्हा यांच्याबद्दल जाणून घेऊया.
-
यशवंत सिन्हा यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९३७ रोजी बिहारमधील पाटणा येथील कायस्थ कुटुंबात झाला.
-
त्यांनी राज्यशास्त्रातील पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. पाटणा विद्यापीठात त्यांनी राज्यशास्त्राचे शिक्षक म्हणूनही काम केले आहे.
-
राजकारणात येण्यापूर्वी सिन्हा हे आयएएस अधिकारी होते. २४ वर्षे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केल्यानंतर १९८४ मध्ये त्यांनी केंद्रीय सेवेचा राजीनामा दिला.
-
त्यानंतर त्यांनी जनता दलात प्रवेश करून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
-
१९८६ मध्ये सिन्हा जनता दलाचे महासचिव होते. १९८८ मध्ये ते राज्यसभेवर निवडूण गेले.
-
सिन्हा तीन वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडूण गेले आहेत.
-
१९९२ मध्ये सिन्हा यांनी भाजपात प्रवेश केला. ते भाजपाचे प्रवक्तेही राहिले आहेत.
-
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिले आहे.
-
२००२ ते २००४ या कालावधीत ते देशाचे परराष्ट्र मंत्री होते.
-
२०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यावर सिन्हा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.
-
मोदीविरोधामुळे सिन्हा यांना भाजपाला सोडचिठ्ठी द्यावी लागली.
-
२०२१ मध्ये सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते पक्षाचे उपाध्यक्ष होते.
-
आता राष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षांकडून उमेदवारी मिळाल्यानंतर यशवंत सिन्हा चर्चेत आले आहेत.
-
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस, यशवंत सिन्हा/ ट्विटर)

शिकवणी न लावताही पुण्यातील रावी नामजोशीने मिळवले दहावीत पैकीच्या पैकी गुण