-
शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी मुंबईतील रस्त्यांच्या कामांवरून शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. खोके सरकारने मुंबई महापालिकेची लूट सुरू केली आहे. पाच हजार रस्त्यांचं कोटींचं टेंडर ही धुळफेक आहे.
-
“४०० किलोमीटर रस्त्यांसाठी ६ हजार ८० कोटी रुपयांचं टेंडर काढलं आहे. १ ऑगस्ट ते १ मे दरम्यान मुंबईतील रस्त्यांची काम केली जाता. मग, फेब्रुवारीत कंत्राट निघालं तर रस्त्यांची काम कधी होणार?,” असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
-
“निवडणुका आल्याने मुंबईकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करत काहीही जाहीर करायचं. १९९६ ला सत्ता आली तेव्हा मुंबई महापालिका तोट्यात होती.”
-
“पण, २५ वर्षे काम करुन मुंबईकरांचा पैसा जपून, सोयी-सुविधा देत मुंबई पालिकेला नफ्यात आणलं. त्यामुळे देशाचं लक्ष मुंबई महापालिकेवर आहे.”
-
“आता अशीच काम होत असेल तर मुंबई महापालिकेची एफडी तोडावी लागेल,” अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी खडेबोल सुनावले आहेत.
-
“ठाणे आणि अन्य महापालिका तोट्यात आहे. तसे मुंबईपालिका खोके सरकारमुळे तोट्यात जाईल.”
-
“या सगळ्या गोष्टी घडत असताना ४८ टक्के फायदा कंत्राटदारांना करून देण्यात आला आहे.
-
“महापालिकेत कोणतीही महापौर किंवा लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकांनी ही कामं मंजूर कशी केली,” असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला.
-
“कंत्राटांची खिरापत वाटण्यात आली, तो पैसा मुंबईकरांच्या खिशातला आहे. कामाची समज नसतानाही कंत्राट काढण्यात आली.”
-
“मुंबई सगळीकडे क्राँक्रिटचे रस्ते करायचे हे कुठून सुचलं.”
-
“मुख्यमंत्र्यांना वाटतं दोन वर्षात मुंबईतील रस्ते सिमेंट-क्राँक्रिट होऊ शकतात, मग ठाणे, कल्याण-डोबिंवली, नवी मुंबईतील गल्लीत चांगले रस्ते का नाही झाले.”
-
“मग प्रत्येकवेळी मुंबईवर राग काढायचा, पैसे लुटायचं,” असा आरोप आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केला.

“…भाजपात आलोय, ही माझी अडचण”; फडणवीसांच्या उपस्थितीत भरसभेत नारायण राणेंचं विधान!