-
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आता गंभीर परिस्थितीत बदलला आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ६-७ एप्रिल २०२५ च्या मध्यरात्री पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पीओके (पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर) मधील ९ दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यात आला, ज्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. (ANI Photo)
-
या घटनेपासून, दोन्ही देशांमधील तणाव लक्षणीयरीत्या वाढला आहे आणि याचा नागरिकांच्या सुरक्षिततेवरही परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेचे उपाय अवलंबण्याची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवायला हवे असे काही महत्त्वाचे उपाय येथे आहेत:
(ANI Photo) -
जीवनावश्यक वस्तूंचा साठा करा
आपत्कालीन परिस्थितीत, अन्न, पाणी आणि औषधांचा साठा करणे अत्यंत महत्वाचे आहे. या गोष्टी कमीत कमी एक आठवडा पूरतील अशा हव्यात, पण भीतीपोटी किंवा घाबरून जास्त वस्तू खरेदी करू नका. हुशारीने आणि गरजेनुसार साठवणूक करा. (Photo Source: Pexels) -
तुमचा टॉर्च आणि पॉवर बँक चार्ज ठेवा
अशाच परिस्थितीत अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. या परिस्थितीत, चार्ज केलेला टॉर्च आणि पॉवर बँक असणे खूप महत्वाचे आहे. हे तुम्हाला रात्री आणि वीज खंडित होण्याच्या वेळी मदत करेल. (Photo Source: Pexels) -
रोख रक्कम ठेवा
आपत्कालीन परिस्थितीत, एटीएम काम करू शकत नाहीत किंवा बँक सेवांवर परिणाम होऊ शकतो. या परिस्थितीत घरी काही रोख रक्कम ठेवणे आवश्यक आहे. हे तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत करेल. (Photo Source: Pexels) -
बॅटरीवर चालणारा एफएम रेडिओ घ्या.
इंटरनेट सेवा बंद असू शकतात, परंतु तुम्ही बॅटरीवर चालणाऱ्या एफएम रेडिओद्वारे सरकारी आणि अधिकृत माहिती मिळवू शकता. हे तुम्हाला परिस्थितीबद्दल अपडेट्स देईल आणि तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. (Photo Source: Pexels) -
महत्त्वाचे कागदपत्रे क्लाउडवर अपलोड करा
तुमच्याकडे तुमच्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांच्या डिजिटल प्रती असाव्यात. जसे की आधार कार्ड, पासपोर्ट, मालमत्तेची कागदपत्रे इ. ती गुगल ड्राइव्ह किंवा इतर कोणत्याही क्लाउड स्टोरेजवर अपलोड करा जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही ती सहजपणे वापरू शकाल. (Photo Source: Pexels) -
खोट्या बातम्यांपासून सावध
अशा परिस्थितीत, सोशल मीडियावर खोट्या बातम्या आणि अफवा पसरू शकतात. व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इतर प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या मेसेजेसपासून सावध रहा. फक्त सरकारी आणि अधिकृत स्रोतांकडून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. (Photo Source: Pexels) -
सावध आणि जागरूक राहा
ही अशी वेळ आहे जेव्हा आपल्याला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. जर तुम्हाला काही संशयास्पद हालचाल आढळली तर ताबडतोब पोलीस व संबंधीत अधिकाऱ्यांना कळवा. तुमच्या सभोवतालच्या लोकांशी संपर्कात रहा आणि तुमच्या परिसराच्या सुरक्षिततेबद्दल जागरूक रहा. (Photo Source: Pexels)

Maharashtra SSC Result 2025 : दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणारे ‘हुश्शार विद्यार्थी’; जिल्ह्यानुसार वाचा सविस्तर यादी