-
शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण आणि उत्सव आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते. हा उत्सव संपूर्ण जगात भव्य प्रमाणात साजरा केला जातो.
-
सर्वप्रथम महात्मा महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती साजरी केली. १८६९ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम जागवावे आणि त्याचा उपयोग ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी करावा, हा त्यामागील हेतू होता. सुरुवातीला शिवजयंती फक्त महाराष्ट्रात साजरी होत होती, परंतु २० व्या शतकाच्या पहिल्या दशकात हा उत्सव बंगालमध्येही पोहोचला.
-
दरवर्षी महाराष्ट्रात १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याच दिवशी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून मराठी सत्तेचा उदय घडवून आणला. त्यांच्या या कार्यात त्यांच्या माता जिजाबाई यांचे मोठे योगदान होते.
-
शिवाजी महाराजांचे नाव शिवाई देवीच्या नावावरून ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार, शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती, म्हणून त्या मुलाचे नाव ‘शिवाजी’ ठेवण्यात आले. शिवरायांचे वडील शहाजी राजे भोसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतीची सेवा केली. त्यांच्या आई जिजाबाई या सिंदखेडचे लखुजी जाधवराव यांच्या कन्या होत्या. जाधव हे देवगिरीच्या यादव राजघराण्याचे वंशज होते.
-
शिवाजी शहाजी भोसले (१९ फेब्रुवारी १६३० – ३ एप्रिल १६८०), ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज किंवा शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाते, हे एक महान भारतीय शासक आणि भोसले घराण्याचे सदस्य होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीतून त्यांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इ.स. १६७४ मध्ये रायगड किल्ला येथे त्यांचा औपचारिक राज्याभिषेक छत्रपती म्हणून करण्यात आला.
-
आपल्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपीय वसाहतवादी शक्तींशी युती आणि संघर्ष दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर आणि सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर त्यांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रगत राज्य उभे केले.
-
महाराजांनी किनारी आणि अंतर्गत भागातील किल्ल्यांची दुरुस्ती करण्यासोबतच त्यांनी अनेक नवीन किल्लेही बांधले. त्यांनी शिस्तबद्ध प्रशासनासह सक्षम आणि प्रगत नागरी शासन व्यवस्था निर्माण केली आणि प्राचीन हिंदू राजकीय परंपरा व न्यायव्यवस्था पुनरुज्जीवित केली.
-
प्रदेशातील भूभागाची सखोल माहिती, वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याच्या तंत्राच्या सहाय्याने त्यांनी कमी सैन्याच्या बळावर मुघल आणि आदिलशाहीसारख्या बलाढ्य सत्तांचा यशस्वी सामना केला. राज्यकारभारात पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या कथा लोकांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी वापरल्या.
-
शिवाजी महाराजांचा वारसा काळानुसार अधिक प्रभावी होत गेला. त्यांच्या निधनानंतर सुमारे दोन शतकांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात त्यांचे महत्त्व अधिक वाढले. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांना आद्य राष्ट्रवादी आणि हिंदूंचे नायक मानले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात त्यांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी अस्मितेचे प्रतीक असून त्यांचा जन्मदिवस शिवजयंती म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Robert Kiyosaki: “मी पुन्हा एकदा इशारा देत आहे”, कोसळत असलेल्या शेअर बाजाराबाबत ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या लेखकाची पोस्ट चर्चेत