-
नितीश कुमार यांनी राज्यसभेचे सदस्यत्व स्वीकारण्याची आणि बिहारचे मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी केल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शनिवारी भाजापवर टीका केली आणि हे पीडीए समुदायांचा अपमान असल्याचे म्हटले. (Source: Photo by Vishal Srivastava)
-
लखनऊ येथील पक्षाच्या मुख्यालयात बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, या निर्णयामुळे PDA या संक्षिप्त नावाने ओळखल्या जाणाऱ्या समुदायांवर परिणाम झाला आहे. त्यांच्या मते पीडीए म्हणजे ‘पिछडे’ (मागासवर्गीय), दलित आणि ‘अल्पसंख्याक’ होय. (Source: Photo by Vishal Srivastava)
-
आपल्या भाषणात यादव यांनी असा आरोप केला की, हा निर्णय म्हणजे पीडीए समुदायांचा अपमान आहे. भाजपाचा या सामाजिक गटांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाशी, त्यांनी या निर्णयाचा संबंध जोडला. (Source: Photo by Vishal Srivastava)
-
पत्रकारांशी संवाद साधताना अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्रिपदाच्या तुलनेत राज्यसभा सदस्यत्वाच्या महत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्यसभेची सीट मोठी की मुख्यमंत्रिपद, असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. (Source: Photo by Vishal Srivastava)
-
यादव यांनी दावा केला की विरोधी पक्ष इंडिया आघाडी नितीश कुमार यांना पंतप्रधान बनवू इच्छित होती. (Source: Photo by Vishal Srivastava)
-
त्यांनी असाही दावा केला की जेव्हा सपा आणि बहुजन समाजवादी पक्ष (बसपा) यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान युती केली होती, तेव्हा त्यांच्या पक्षाला बसपा प्रमुख मायावती पंतप्रधान व्हाव्यात अशी इच्छा होती. (Source: Photo by Vishal Srivastava)
-
तसेच त्यांनी असा दावा केला की, जेव्हा सपा (SP) आणि बहुजन समाज पक्ष (BSP) यांची युती झाली होती (२०१९ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान), तेव्हा त्यांच्या पक्षाची मायावती यांनी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा होती. (Source: Photo by Vishal Srivastava)
-
बिहारमधील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत अखिलेश यादव म्हणाले की, २०२५ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्या पक्षाने भाकीत केले होते की नितीश कुमार हे पंतप्रधान म्हणून नव्हे तर मुख्यमंत्री म्हणून निवृत्त होतील. पुढे ते असेही म्हणाले की, भाजपाने एक पाऊल पुढे टाकले असून आता ते त्यांना राज्यसभा सदस्य म्हणून निवृत्त करतील. (Source: Photo by Vishal Srivastava)
-
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारवरही जोरदार हल्ला चढवला, ते सरकार अत्यंत अराजक आणि भ्रष्ट सरकार असल्याचा आरोप त्यानी केला. तसेच ते माफियांच्या सरकारसारखे काम करत असल्याचा आरोप केला. (Source: Photo by Vishal Srivastava)
-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा नेत्यांमधील समन्वय बैठकांवर भाष्य करताना यादव यांनी असा आरोप केला की, या बैठका भाजपा आमदांराची तिकिटे कापण्याबाबत निर्णय घेण्यासाठी घेतल्या जात आहेत. त्यांनी दिल्ली आणि कानपूर येथे नुकत्याच झालेल्या बैठकांचा संदर्भ दिला. (Source: Photo by Vishal Srivastava)