अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कष्टकऱ्यांचा संघर्ष
- 1 / 24
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण देशभरात मजूर वर्गाला या निर्णयाचा फटका बसताना दिसत आहे. (सर्व छायाचित्र - प्रशांत नाडकर)
- 2 / 24
रोजगार तुटल्यामुळे आता ही मंडळी मिळेल त्या पर्यायाचा वापर करत आपल्या गावाकडे निघालेली आहेत
- 3 / 24
मुंबई-आग्रा महामार्गावर सायकलवर मिळेल ते सामान लादून आपल्या गावची वाट धरणारे मजूर
- 4 / 24
स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता आणि प्रश्न कायम आहेत, आपण घरी पोहचणार तरी कधी??
- 5 / 24
प्रवास इतका मोठा आणि खडतर आहे की कधीकधी हातातलं सामान मागे राहतं...पण मजुरांना आता सामानाची फारशी चिंता नाहीये
- 6 / 24
वाटेत कुठेही मोफत जेवणाची सोय दिसली की थांबायचं आणि चार घास पोटात ढकलायचे
- 7 / 24
करोनापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणं वगैरे ठीक आहे हो...पण हातावर पोट असणाऱ्यांचा रोजगार तुटला की काही गोष्टींचं भान राहत नाही
- 8 / 24
काही जणं रांगेत उभं राहतात तर काही जण खाली बसून आराम करणं पसंत करतात
- 9 / 24
कारण इतका मोठा प्रवास करायचा असेल तर थोड्या विश्रांतीची गरज सर्वांनाच असते.
- 10 / 24
फुटपाथवर झाडाच्या सावलीखाली विसावलेला कामगार
- 11 / 24
जेवता-जेवता मग थोड्याशा गप्पा रंगतात
- 12 / 24
काही जणं यादरम्यान थोडीशी डुलकी घेणं पसंत करतात
- 13 / 24
झाडाच्या सावलीत विसावलेले कामगार
- 14 / 24
विश्रांती झाली की मग पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाची चिंता
- 15 / 24
कष्टकऱ्यांच्या नशिबातला संघर्ष काहीकेल्या कमी होत नाही
- 16 / 24
डोक्यावर सामान आणि कडेवर मुलाला घेऊन घराची वाट पकडलेली महिला कामगार
- 17 / 24
या परिस्थितीतही आपल्या मुलाला ऊन लागू नये याची काळजी आई घेताना दिसतेय
- 18 / 24
सध्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी आहे...पण तरीही प्रवासादरम्यान धोका हा कायम असतो
- 19 / 24
वाटेत कितीही संकटं आली तरीही थांबायचं नाही हेच आता या कामगारांनी ठरवलं आहे
- 20 / 24
या कामगारांचा प्रवास किती खडतर असणार आहे याची साक्षच हे झाड देत आहे असं वाटतंय
- 21 / 24
रस्त्याच्या कडेला विसावलेले तरुण कामगार
- 22 / 24
संकटकाळात शहराने साथ सोडली म्हणून अखेरीस या मजुरांना गावची वाट पकडावी लागली
- 23 / 24
गड्या आपला गाव बरा असं म्हणतात ते काही खोटं नाही
- 24 / 24
सूर्य मावळतीला आला तरीही डोक्यावरचं ओझं काही पाठ सोडेना. करोनामुळे भारतातला मजूर वर्ग खऱ्या अर्थाने त्रासला गेला आहे