-
मंत्री नवाब मलिक आणि जास्मिन वानखेडे यांच्यातील आरोप प्रत्यारोप सुरूच आहे.
-
नवाब मलिक यांनी पुन्हा समीर वानखेडे आणि जास्मिन वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत.
-
करोना काळात संपूर्ण फिल्म इंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
-
नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी बोलताना समीर वानखेडे यांच्यावर नव्याने काही आक्षेप घेत गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये सर्व वसुली मालदीवमध्ये झाल्याचं ते म्हणाले आहेत.
-
कोविड काळात सगळी इंडस्ट्री मालदीवमध्ये होती. समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय देखील त्या काळात मालदीवमध्ये होते. ते दुबई आणि मालदीवमध्ये काय करत होते? आम्ही मागणी करतो की त्यांनी सांगावं ते दुबईला गेले होते का? सगळी वसुली मालदीव आणि दुबईत झाली, ज्याचे फोटो आम्ही तुम्हाला देऊ, असं नवाब मलिक म्हणाले.
-
सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची केंद्र सरकारने एनसीबीमध्ये बदली केली. त्याचा तपास सीबीआयला दिला गेला. एसीबीचा खेळ सुरू झाला. लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली, असा आरोप त्यांनी केलाय.
-
काही लोकांना खोट्या प्रकरणांमध्ये फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ४-४ हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला.
-
व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून बऱ्याच अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले”, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
-
दरम्यान, यावरून जास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिक यांना इशारा दिला आहे.
-
मी नवाब मलिक यांचं ऑस्ट्रेलिया कनेक्शन काढू का, असा इशारा जास्मिन वानखेडे यांनी दिलाय.
-
मात्र, ऑस्ट्रेलिया वर आता जास्त बोलणार नाही वेळ आली की नक्की बोलेन, असं त्या म्हणाल्या.
-
तसेच ऑस्ट्रेलियाबद्दल नवाब मलिक यांना विचारा ते सांगतील, असंही यास्मिन यांनी म्हटलं आहे. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

“मी ट्रेनमधील पंख्याला पकडून…”, रेल्वे अपघातातून बचावलेल्या प्रवाशाचा थरारक अनुभव; म्हणाला, “सीटखाली दोन वर्षांचा मुलगा…”