-
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ३३८ वा पालखी प्रस्थान सोहळा आज दुपारी दोनच्या सुमारास पार पाडणार आहे.
-
या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक देहूत दाखल होत आहेत.
-
या पार्श्वभूमीवर संस्थानाने जय्यत तयारी केली आहे.
-
पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करताना वारकरी पाहायला मिळाले.
-
पालखी प्रस्थानाची सुरुवात पहाटे पासूनच विधिवत पूजाने सुरुवात झाली आहे.
-
मुख्य मंदिरासह तुकोबांच्या शिळा मंदिरावर आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे.
-
वर्षांमध्ये एकदा येणाऱ्या पालखी सोहळ्याचे वारकरी आतुरतेने वाट पाहत असतात.
-
मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग आषाढी वारीसाठी घरातून बाहेर पडतो.
-
जून सुरू होऊन देखील अद्याप पाऊस पडलेला नाही त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे पाऊस पडावा असं साकडं सध्या तुकोबा चरणी घालताना वारकरी बघायला मिळतात.
-
टाळ- मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकारामाच गजर करत एक-एक पाऊलवाट तुडवत वारकरी पंढरीच्या दिशेने आज वाटचाल करणार आहे.
-
येत्या २९ जूनला (गुरुवारी) आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – कृष्णा पांचाळ/लोकसत्ता)

“जेव्हा पक्ष सांगेल, तुझी गरज नाही आता…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान