-
ओडिशातील पवित्र पुरी येथे भगवान जगन्नाथांची नऊ दिवसांची वार्षिक रथयात्रा सुरू झाली आहे.
-
या अत्यंत महत्त्वाच्या धार्मिक उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून लाखो भाविक पुरीत एकत्र आले आहेत.
-
प्रथेनुसार, भगवान जगन्नाथ, त्यांचे मोठे बंधू भगवान बलभद्र आणि बहीण देवी सुभद्रा यांच्यासह १२ व्या शतकातील जगन्नाथ मंदिरापासून त्यांच्या जन्मस्थानी म्हणजेच ‘गुंडीचा मंदिरा’कडे ९ दिवसांच्या प्रवासासाठी निघतात.
-
या नऊ दिवसांच्या उत्सवाचे नेटके नियोजन करण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी १२,००० पोलीस कर्मचारी, १९ आयपीएस अधिकारी आणि १०० हून अधिक प्रशासकीय अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
-
ओडिशाच्या पुरी शहरात नऊ दिवसांच्या वार्षिक जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात झाली असून, या पवित्र सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी लाखो भाविकांची अलोट गर्दी जमली आहे.
-
परंपरेनुसार, भगवान जगन्नाथ, त्यांचे बंधू भगवान बलभद्र आणि बहीण देवी सुभद्रा यांच्यासह जगन्नाथ मंदिराकडून त्यांच्या जन्मस्थानी म्हणजेच ‘गुंडीचा मंदिरा’कडे प्रवासासाठी निघाले आहेत.
-
या यात्रेसाठी तिन्ही देवता तीन मोठ्या आणि सुंदर सजवलेल्या रथांमध्ये विराजमान होतात.
-
पुरीच्या मुख्य रस्त्यावरून लाखो भाविक हे रथ दोरीने ओढतात.
-
गेल्या वर्षी रथ ओढण्यास उशीर झाल्यामुळे भाविकांना त्रास झाला होता.
-
त्यामुळे यंदा सर्व धार्मिक विधी वेळेत पूर्ण करण्याला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
-
लाखो भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सरकारने गर्दी नियंत्रणासाठी आणि सुरक्षेसाठी चोख व्यवस्था केली आहे.
-
यंदाच्या यात्रेदरम्यान देश-विदेशातून सुमारे ३० लाख (३ मिलियन) भाविक पुरीला भेट देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा