-
भारताने ९व्या-१०व्या शतकातील २९ मूर्ती ऑस्ट्रेलियातून परत आणल्या आहेत. या प्रामुख्याने वाळूचा खडक, संगमरवरी, कांस्य, पितळ आणि कागदात कोरलेली शिल्प आणि चित्र आहेत.
-
या कलाकृतींमध्ये भगवान शिव, त्यांचे शिष्य, भगवान विष्णू आणि त्यांची रूपे, जैन परंपरा, चित्रे आणि सजावटीच्या वस्तूंचा समावेश आहे.
-
भारतीय इतिहासाशी संबंधित हे पुरातत्व अवशेष तस्करांनी वर्षापूर्वी देशाबाहेर पाठवले होते. सरकारच्या हस्तक्षेपानंतर या प्राचीन कलाकृती भारतात परत आणण्यात आल्या आहेत. सोमवारी परतल्यावर पंतप्रधान मोदींनी त्यांची पाहणी केली.
-
ही प्राचीन शिल्प राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमधील आहेत.
-
एक ऐतिहासिक पाऊल म्हणून ऑस्ट्रेलियाने भारताला २९ पुरातन वास्तू परत केल्या आहेत, असे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले.
-
गेल्या वर्षी जुलैमध्ये भारत सरकारच्या पुढाकारानंतर ऑस्ट्रेलियाने ही कलाकृती भारताला परत करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा आर्ट गॅलरीने भारतातून चोरलेल्या कलाकृतींची ओळख पटवली होती.
-
गॅलरीच्या संचालकांनी सांगितले की, कलाकृती मूळ देशात परत करणे ही सांस्कृतिक जबाबदारी आहे आणि ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील सहयोगाचा परिणाम आहे. सहकार्याबद्दल आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत आणि आता आम्ही या सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण वस्तू परत करू शकलो याचा आनंद आहे.
-
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या २०० हून अधिक प्राचीन मूर्ती गेल्या काही वर्षांत भारतात परत आणल्या गेल्या आहेत.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ फेब्रुवारी रोजी ‘मन की बात’मध्ये भारतातील प्राचीन मूर्तींचा उल्लेख केला होता. या मूर्ती परत आणणे ही भारतमातेप्रती आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले होते.
-
२०१३ पर्यंत केवळ १३ मूर्ती भारतात आणता आल्या होत्या, गेल्या सात वर्षांत २०० हून अधिक मौल्यवान मूर्ती भारतात आणण्यात यश आल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते.
-
२०१४ मध्ये देखील ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदू देवतांच्या दोन प्राचीन मूर्ती सुपूर्द केल्या होत्या, ज्या तमिळनाडूतील मंदिरांमधून चोरीला गेल्या होत्या.
-
या ऐतिहासिक कलाकृती भारतात परत आणल्यामुळे सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक होत आहे. (सर्व फोटो: PIB India)
