-

महाराष्ट्रात इतके विलक्षण लोक जन्माला आले. पण आपण त्या सर्वांना जातीमध्ये अडकलं आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
-
मराठी चित्रपट ‘हर हर महादेव’च्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या चित्रपटासाठी राज ठाकरे यांनी आवाज दिला आहे.
-
यावेळी बोलताना राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या आठवणी, विचार मोकळेपणाने मांडले.
-
तसंच राज्यातील सध्याच्या सामाजिक स्थितीवर भाष्य करत नाराजी जाहीर केली.
-
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची ओळखच आहे.
-
महात्मा ज्योतीराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत ज्ञानेश्ववर महाराज यांच्यासह इतके संत, साहित्यिक, क्रांतीकारक आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले आणि ही माती विचारांनी सुपिक केली.
-
पण आपण त्यांना जातीमध्ये बांधत आहोत. हे मराठ्यांचे, हे दलितांचे, हे माळ्याचे… इतका घाणेरडा विचार असलेला महाराष्ट्र मी याआधी कधी पाहिलेला नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
-
राज ठाकरे पुढे म्हणाले, “ही सर्वांची माणसं असून आपण त्यांना सर्वदूर पोहोचवली पाहिजेत.
-
आमच्याकडे किती विलक्षण माणसं होऊन गेली हे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे.
-
पण त्याऐवजी आपण हे आमचे असून यांचं नाव तुम्ही घ्यायचं नाही, लिहायचं नाही असं सांगत असतो.काहींना यातून आनंद मिळतो, तर काहींना राजकीय फायदे मिळतात, असंही राज ठाकरे म्हणाले.
-
इतकी मोठी माणसं आपल्याकडे जन्माला आल्यानंतर त्यांचे गुणगान गाण्याऐवजी जातीत कसले बांधत आहोत?
-
छत्रपतींनी तर १८ पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची उभारणी केली होती.
-
त्यांना आपण जातीत बांधत आहोत. लोकमान्य टिळकांना आपण ब्राह्मण म्हणत आहोत.
-
हा महाराष्ट्र आपण कुठे नेऊन ठेवला आहे?
-
पूर्वी दूरदर्शनला ‘आपली माती, आपली माणसं’ कार्यक्रम यायचा, त्याचं नाव बदलून आता ‘आमच्या माणसांनी केलेली आमची माती’ असं केलं पाहिजे,” असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. (सर्व संग्रहित फोटो- लोकसत्ता)
“इतका घाणेरडा विचार असलेला महाराष्ट्र मी कधीही…” सध्याच्या राजकीय स्थितीवर राज ठाकरेंचा संताप
मराठी चित्रपट ‘हर हर महादेव’च्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या चित्रपटासाठी राज ठाकरे यांनी आवाज दिला आहे.
Web Title: Subodh bhave interviewed raj thackeray har har mahadev movie rmm