-
दरवर्षी ५ जून रोजी जगभरात पर्यावरण दिन साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश प्रदूषण कमी करून निसर्गाचे रक्षण करणे हा आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
सध्या प्लास्टिक कचरा ही जगातील मोठी समस्या बनली असून त्याचे कण नद्या, जंगले, समुद्र आणि आपल्या अन्नातही पोहोचले आहेत. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
भारतातील सिक्कीम हे प्लास्टिक पिशव्यांवर संपूर्ण बंदी घालणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
देशात सर्वत्र प्लास्टिकचा वापर सुरू असताना, सिक्कीम सरकारने १९९८ मध्येच यावर बंदी घालून मोठा आदर्श निर्माण केला. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
सिक्कीमने २०१६ मध्ये सर्व सरकारी कार्यालये आणि कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरण्यावर पूर्णपणे बंदी आणली. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकारने थर्मोकोल आणि प्लास्टिकपासून बनवलेल्या ताट, वाट्या आणि चमचे यांच्या वापरावरही बंदी घातली. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
प्लास्टिकऐवजी सिक्कीममध्ये झाडांची पाने, बांबू आणि इतर निसर्गपूरक वस्तूंपासून बनवलेल्या उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
केवळ प्लास्टिक मुक्तीच नव्हे, तर २०१६ मध्ये रासायनिक खते बंद करून सिक्कीम देशातील पहिले पूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य बनले. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
अनेक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या धोरणांमुळेच सिक्कीम आज संपूर्ण देशासाठी पर्यावरणीय नेतृत्वाचे एक उत्तम प्रतीक बनले आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…